HW News Marathi
महाराष्ट्र

नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट

मुंबई | राज्यातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (२२ सप्टेंबर) मंत्रालयात बैठक पार पडली. हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतो. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येणार आहे. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एकाच छताखाली मिळतील यादृष्टीने वेबपोर्टल तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला कोणकोणत्या विभागाच्या परवानग्या लागतात, त्यातील कोणत्या आवश्यक नसलेल्या परवानग्यांची संख्या कमी करता येईल याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जास्त काय सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे ‘हे’ पर्याय!

News Desk

नारायण राणेंच्या अटके साठी नाशिक पोलिस आयुक्तांचे निर्देश!

News Desk

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार विधेयक मंजूर

News Desk