HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरुन निलेश राणे आक्रमक  

रत्नागिरी | राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनामुळे माजी खासदार नितेश राणे सध्या आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा अंत पाहू नये . मराठ्यांनी पुढचे पाऊल उचलले तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल, असा धमकीवजा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

रत्नागिरीतील आंदोलनावेळी माजी खासदार निलेश राणे बोलत होते. आंदोलनकर्ते सर्व शिवरायांचे मावळे आहेत. जोपर्यंत 16 टक्के आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर आजपर्यंत मराठा समाजाने खूप सोसले आहे. आता वेळ निघून गेली आहे त्यामुळे आरक्षण लवकर मिळाले नाही तर मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक होतील आणि ते सरकारला भारी पडेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या ‘अर्थसंकल्प, सोप्या भाषेत’ पुस्तकावर कोपरखळ्या

swarit

पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण?, नवज्योतसिंग सिद्धूंसह 4 नावांची चर्चा!

News Desk

‘तिरंदाजीत भारताला पहिलं पदक!’

News Desk
मुंबई

कुर्ला एस.टी. आगारामध्ये ९ ऑगस्टला ‘चले जाव’ आंदोलन

News Desk

मुंबई | कुर्ला पूर्व येथील एस.टी. आगारामध्ये तीन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या नव्या डेपो मॅनेजरने क्षुल्लक कारणांवरूनही कर्मचाऱ्यांना नाना प्रकारे छळण्याचे सत्र अवलंबले आहे. मनमानीपणे जबर दंडाची वसुली, तडकाफडकी निलंबन, रजेनंतर कामावर घेण्यास नकार, बडतर्फीच्या धमक्या अशा कारवायांमुळे डेपोमधील कर्मचारी हैराण झाले आहेत. म्हणून येत्या ९ ऑगस्ट रोजी डेपो मॅनेजर गुलाब बच्छाव यांच्या विरोधात सह्यांची मोहीम हाती घेऊन ‘चले जाव’ आंदोलन करण्यात येणार आहे.

कुर्ला एस.टी. आगारामध्ये चारशे कर्मचारी कार्यरत आहेत. डेपो मॅनेजर गुलाब बच्छाव यांनी चालवलेला अन्याय आणि छळामुळे वयाची ५८ वर्षे पूर्ण करून निवृत्त होईपर्यंत न थांबता ५५ व्या वर्षीच सेवानिवृत्ती पत्करण्याचा विचार अनेक त्रस्त कर्मचारी बोलून दाखवत आहेत. रजा केल्याबद्दल कर्मचाऱ्यांवर दंड आकारण्याची पद्धत एस.टी. महामंडळात आहे, पण दंडाची रक्कम माफक असते. डेपो मॅनेजर बच्छाव यांनी मात्र रजेबद्दल सुमारे 3 हजार रुपयांचा दंड आकारण्यापर्यंत मजल मारली आहे. अपघातग्रस्त वा आजारी कर्मचाऱ्यांना रजेवरून परतल्यानंतर वैद्यकीय उपचारांची कागदपत्रे जवळ असतानाही डेपो मॅनेजर त्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यास सर्रास नकार देतात. त्या कर्मचाऱ्यांना बरेच दिवस तिष्ठत बसवून गुलाब बच्छाव हे कामगारांचा छळ करत आहेत.

Related posts

जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आपल्या महापौरपदाचा राजीनामा द्या !

News Desk

वडाळ्यात इमारतीला आग, १५ जण गुदमरले

News Desk

वरळीतील साधना हाऊसमधील आग नियंत्रणात, अग्निशमन दलाचे १२ जवान जखमी

News Desk