HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या ‘अर्थसंकल्प, सोप्या भाषेत’ पुस्तकावर कोपरखळ्या

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या अर्थसंकल्प, सोप्या भाषेत या पुस्तकाचे प्रकाशन काल (४ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यांच्या पुस्तकाचे आणि लिखाणाचे कौतुक करताना, देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून पुढील पाच-दहा वर्षे अशीच पुस्तके लिहा म्हणजे आम्हाला आमच्या उणिवा कळतील आणि आम्ही पुढे जाऊ अशा शब्दांत कौतुक करत हळूच टोमणाही मारला. विधानभवनात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

फडणवीसांच्या या पुस्तकावर अनेकांनी आपले मनोगत आणि मते मांडली. अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगण्याची वेळ येण्यापेक्षा अर्थसंकल्पच सोप्या भाषेत मांडायला हवा असे मत सभापती रामराजे निंबाळकर यांनी मांडले. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, फडणवीस हे चांगले साहित्यिक आहेत. त्यांचा अभ्यास पाहता आम्ही २८८ आमदार त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठी ठराव करु. आणि जर फडणवीस दिल्लीत गेले तर सुधीर मुनगंटीवार जास्त खुश होती, असा हळूच चिमटाही अजित पवार यांनी काढला. सर्व मान्यवरांच्या पुस्तकावरील प्रतिक्रिया ऐकल्यानंतर फडणवीस म्हणाले, ‘अर्थसंकल्प हा माझा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. त्यातूनच सदस्यांना अर्थसंकल्प समजावा म्हणून मी हे पुस्तक लिहिले आहे. सदस्यांना पुढेही तो समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी माझी नेहमीच तयारी असेल’.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

News Desk

पुण्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात रुग्णांची संख्या १७ वर

swarit

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना अतिशय दुःखद,घटनेची चौकशी करून सरकार दोषींवर कारवाई करणार- छगन भुजबळ

News Desk