HW News Marathi
Covid-19

राज्यावर चक्रीवादळाचे सावट, पंतप्रधानांकडून संपूर्ण मदतीचे आश्वासन

मुंबई | राज्य एकीकडे कोरोनाचा सामना करत असताना आता दुसरीकडे राज्यासमोर एक नैसर्गिक संकट येऊन उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्राला आता चक्रीवादळाचा धोका हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ३ जून म्हणजेच उद्या हे चक्रीवादळ राज्यात धडकेल. त्याचप्रमाणे यामुळे मोठे नुकसानही होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (२ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्यावतीने राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या आपत्तीच्या प्रसंगी केंद्रसरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळापूर्वी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्याचप्रमाणे त्यापुढे बोलताना मुख्यमंत्री असे म्हणाले की, “हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. या वादळात ताशी १०० ते १२५ कि.मी वेगाने वारे वाहतील. या वादळाने नुकसान होऊ नये म्हणून एनडीआरएफच्या १५ व एस.डी.आर.एफच्या ४ अशा १९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत, ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या 50 टक्क्यांहून कमी, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

दिलासादायक | महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ११ हजारांपेक्षा कमी रूग्ण

News Desk

मोठी बातमी ! Twitter India च्या कार्यालयांवर दिल्ली पोलिसांचे छापे

News Desk