HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप- सेना युतीवर नितेश राणेंचं थेट भाष्य! म्हणाले…

सिंधुदुर्ग। शिवसेना आणि राणे कुटुंब हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. आधी आदित्य ठाकरे आणि त्या नंतर उद्धव ठाकरे यांच्या वर भाजप आमदार नितेश राणे हे टीका करत होते. मात्र सिंधुदुर्गमध्ये आयोजित एका कार्यक्रमात नितेश राणेंनी शिवसेनेबद्दल केलेल्या विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. सिंधुदुर्गमधील सागररत्न बाजारपेठेचा लोकार्पण सोहळा काल (१० जुलै) संपन्न झाला. त्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाजप आमदार नितेश राणे, शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी नितेश राणेंनी केलेल्या भाषणाची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. व्यासपीठावर असलेले शिवसेना, भाजपचे नेते पाहून आता पुन्हा युतीची चर्चा सुरू होईल.

एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतील

भाजप शिवसेना हे समीकरण लोकांच्या चर्चेत असतंच . ‘काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरू होती. त्यानंतर ती बंद झाली. मात्र आता भाजप, शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्यानं युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल,’ असं राणे म्हणाले. ‘कोकणच्या, राज्याच्या विकासासाठी पक्ष नेतृत्त्वानं एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेवर कायम टीका करणाऱ्या नितेश राणेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास तुम्ही काय करणार?

भाजप-शिवसेनेनं हिंदुत्व किंवा आणखी कोणत्या मुद्द्यावरून एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास तुम्ही काय करणार?, असा प्रश्न राणे यांना केंद्रात मंत्रिपद स्वीकारण्यात आल्यानंतर विचारण्यात आला. त्यावर भाजप नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. याबद्दल पक्षाचं नेतृत्व जो निर्णय घेईल त्यासाठी आम्ही तयार असू, असं उत्तर राणेंनी दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”, धनंजय मुंडे प्रकरणाने राजकारण पेटलं 

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उद्या होणार शस्त्रक्रिया

News Desk

कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा !

swarit