HW News Marathi
देश / विदेश

देशात कोणीही सेक्युलर नाही, ‘ती’ एक प्रकारची शिवी । संजय राऊत

मुंबई । “या देशात कोणीही सेक्युलर नाही. जे आपण सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एक प्रकारची शिवी आहे. त्याचा राजकारणात चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला”, असे मोठे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने आपल्या ‘शट अप या कुणाल’ या शोसाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. यावेळी संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत आपले मत मांडले आहे.

संजय राऊत या मुलाखतीत म्हणतात की, “सेक्युलर ही एक प्रकारची शिवी आहे. त्याचा राजकारणात चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. सेक्युलर याच शब्दामुळे देशात हिंदू मुस्लीम अशी थेट विभागणी झाली. यामध्ये तुम्ही केवळ हिंदूंना शिव्या दिल्या की तुम्ही अधिक सेक्युलर आहात असं म्हटलं जातं. हे चुकीचं आहे.” दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात याच मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर संजय राऊत यांचे हे विधान महत्त्वाचे ठरते.

“मुस्लीम या देशाचेच नागरिक आहेत. परंतु काही राजकीय पक्ष त्यांच्या मतांचं राजकारण करत असतात. त्यामुळे नुकसान हे देशाचं होतंच पण त्यांचंही नुकसान होतं. कायम ते अंधारात राहावंस आणि त्यांनी आपल्या मागे यावं अशी त्या राजकीय पक्षांची इच्छा असते. ज्या दिवशी हे मतांचं राजकारण थांबेल त्यादिवशी देश पुढे जाईल असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते”, असे संजय राऊत आपला मुद्दा स्पष्ट करताना पुढे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शोपियानमधील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

Ayodhya Verdict : मध्यस्थी समितीची नेमणूक

News Desk

भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (ईसीटीए) स्वाक्षरी

News Desk