HW News Marathi
महाराष्ट्र

तडजोड केलेली नाही, भाजपची अडचण समजून घेतलीय !

मुंबई | ‘युती करताना १२४ जागा घेऊन मी कुठलीही तडजोड केलेली नाही. एकाकी लढायचे असेल तर शिवसेना कधीही लढू शकते. पण मी भाजपची अडचण समजून घेतलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तशी विनंती केली होती. ‘सामना ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. विधानसभा निवडणुकीत युती करताना कमी जागा घेऊन शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागली आहे.

मी त्यांना समजून घेतले,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी १२४ जागावर निवडणुकीचे स्पष्टीकरण दिले. शिवसेना ऐवढ्या जागेवर लढण्याचा निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली विशेष मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये त्यांची बाजू मांडली.

इतिहासात पहिल्यांदाच १२४ जागा ऐवढ्या कमी आकड्यावर शिवसेनेने भाजपसोबत युती केली आहे. “१२४ जागा हा आकडा शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा असला तरी त्याबरोबरच शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची सुरुवात करणारा हा पहिला आकडा असेल. सर्वाधिक आमदार निवडून आणण्याच्या मोहिमेची सुरुवात या आकड्यापासून होईल.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माशा मारण्याची स्पर्धा दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे”, भाजपचा राष्ट्रवादीला पलटवार

News Desk

शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे!

News Desk

बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधली का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला खडसावलं

News Desk