HW News Marathi
महाराष्ट्र

आम्हाला लोकसभा निवडणुकीची चिंता नाही | शरद पवार

मुंबई | आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपला पर्याय देणार असल्याचे म्हटले आहे. ‘आम्हाला लोकसभा निवडणुकीची चिंता नाही’. तसेच काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असणार नाही. ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान असणार असल्याचे पवार म्हणाले आहेत. राजकारणातील चांगल्या बदलाला तयार असून पक्ष त्याला पाठिंबा असेल असे मत शरद पवार या कार्यक्रमात बोलत होते.

देईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज (सोमवार) पक्षातील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पवार बोलत होते. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

या बैठकीच्या वेळी शरद पवार म्हणाले की, संघटनेसाठी काम करत असताना काही जण पडद्याच्या मागे राहून काम करतात. परंतु पडद्याच्या मागे राहून काम करणाऱ्यांचे योगदान सर्वात मोठे असते. पडद्या मागून काम करणाऱ्यापैकी संजय खोडके एक आहे, असे पवारांनी म्हटेल आहे. अमरावतीत पक्ष वाढीसाठी खोडके यांचा चांगला उपयोग होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अनिल परबांनी किमान मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखावा”

News Desk

‘अजून किती चौकशी करणार आहात’?, खडसेंचा सवाल; फडणविसांच उत्तर..!

News Desk

भंडारा घटनेतील मृत बालकांच्या पालकांना ५ लाखांची मदत जाहीर – राजेश टोपे

News Desk