HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी आता राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे !

मुंबई | “मुख्यमंत्र्यांनी आता राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे”, असा टोला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. “राज्यात जर कोणता विरोधी पक्ष असेल तर तो ‘वंचित आघाडी’ असेल”, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका देखील केली. ते पुण्यात बोलत होते.

“येत्या विधानसभेत विरोधी पक्ष हा ‘वंचित बहुजन आघाडी’ असेल. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही”, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, “लोकसभेपासून वंचित बहुजन आघाडीला भाजपचा छुपा पाठिंबा होता. आता विधानसभेतही असेल. आता मुख्यमंत्र्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे”, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

जे जे विरोधक भाजपमध्ये येण्यास तयार नाहीत त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला जात असून त्यांना धमकीही दिली जाते आहे. राष्ट्रवादीच्याच नव्हे तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाच पद्धतीने धमक्या देऊन भाजपमध्ये घेतले जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिवरे धरण दुर्घटनेसाठी शिवसेनेचे आमदार जबाबदार !

News Desk

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द ठरवणाऱ्या ठाकरे सरकारच्या जीआरला काँग्रेसकडून विरोध

News Desk

पवारांकडून भावना गवळींचं समर्थन, तर किरीट सोमय्यांचा आता पवारांना सवाल!

News Desk