HW News Marathi
महाराष्ट्र

‘चिक्की प्रकरणात पंकजा मुंडे म्हणाल्या….’

लातूर | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावर पंकजा मुंडेंवर अजून गुन्हा कसा दाखल झाला नाही असा प्रहस उपस्थित केला आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी आपल्यावरील बिनबुडाचे असल्याचं वारंवार सांगितलं आहे. चिक्की प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायालयाच्या आदेशाबाबत माध्यमांमध्ये चुकीची माहिती आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,” “निर्णयात पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मी पावलं उचलली. शिक्षक भरती हा एकमेव विषय नाही. तुम्ही मला बघितलं की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अत्यंत सुंदर काम आहे, असे अनेक निर्णय मी घेतले आहेत. यामध्ये पारदर्शक निर्णय आहेत. तितकाच हा पण निर्णय आहे. त्यामुळे असे विचार माझ्या डोक्यात येऊच शकत नाही. मात्र आरोप करणाऱ्यांच्या डोक्यात असे विचार येऊ शकतात. त्यांना दोष देत नाही, कारण त्यांची पर्सनालिटीच तशी आहे. त्यांना कुठेही पैसा दिसतो. कुठेही माफिया दिसतो. कुठेही भ्रष्टाचार दिसतो, ते आरोप करणारच. मी माझं म्हणणं स्पष्ट मांडलं आहे. मी माझा निर्णय अगदी शुद्ध मनाने घेतला आहे. चिक्कीचा ब्रँड जर माझ्या नावाने वाढत असेल. ते खाऊन लोकांचं आयर्न वाढत असेल. मला हरकत नाही”, असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे.

सखोल चौकशी झाली पाहिजे

चिक्की घोटाळा आता पुन्हा डोकं वर करू लागला आहे. “चिक्की घोटाळा निघाल्यापासून माझी सातत्याने मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि आज नाही दोन वर्षा पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एसीबी कडे अर्ज केला आहे. सगळा विषय कोर्टात आहे त्यामुळे माननीय कोर्ट काय निर्णय घेईल ते पाहू” असा मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

काय आहे चिक्की घोटाळा?

अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना वाटली जाणारी चिक्की निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यात अत्यंत खळबळजनक माहिती उजेडात आली होती. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एका दिवसात चिक्की, चटई, डिश, पुस्तकं इत्यादी वस्तूंची तब्बल २०६ कोटींची खरेदी केल्याचे समोर आले होते. या खरेदीसाठी एका दिवसात २४ आदेश काढल्याचाही आरोप झाला होता. या खरेदीत नियमभंग केल्याचाही आरोप झाला होता. याचं कारण ३ लाख रुपयांच्यावरची खरेदी ई-टेंडरद्वारे करण्याचा नियम आहे.

दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिले होते. शिवाय, हे आरोप खोटे आणि राजकीय असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनीही पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जंजिरा किल्ल्यावर 365 दिवस तिरंगा फडकणार ?

News Desk

राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाच्या प्रतिष्ठेची व त्या पदाचे प्रचंड अवमूल्यन करणारी आहे

News Desk

राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ स्थगित

News Desk