HW News Marathi
महाराष्ट्र

‘लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्वे कशाच्या आधारावर’, प्रवीण दरेकरांचा सवाल!

ठाणे। लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यात पहिल्या फाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. हा सर्व्हे कुणी केला? त्यांना काय अॅथोरिटी आहे? कशाच्या आधारावर सर्व्हे केला? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत प्रवीण दरेकर यांनी यावर टीका केली.

एखादी संस्था सर्व्हे करते तेव्हा ती कशाच्या आधारावर करते?

ठाण्यातील कोव्हिड हॉस्पिटलने 500 कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक काढून टाकले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी प्रविण दरेकर आले होते. यावेळी त्यांनी हा सवाल केला. सर्व्हे करणाऱ्यांना कसलीही अॅथोरिटी नाही. एखादी संस्था सर्व्हे करते तेव्हा ती कशाच्या आधारावर करते? त्याबाबत आम्ही खोलात जात नाही. जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचे आहे. जन आशीर्वाद यात्रेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठी जनता आहे हे दिसून येत आहे. हाच आमचा सर्व्हे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक जमले. फडणवीस यांनी पूर काळात मोठं काम केलं होतं. लोक त्याची आठवण करत होते. फडणवीस हेच आपल्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असंही लोक म्हणत होते. आमच्यासाठी हेच महत्त्वाचे आहे, असं सांगतानाच एखाद्या संस्था किंवा चॅनेलचा सर्व्हे हा काही अॅथोराईज निर्णय होऊ शकत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

मोदींना आशीर्वाद देण्यासाठी लोक रॅलीत येत आहेत

जन आशीर्वाद यात्रेतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची यात्रा अयशस्वी करण्यासाठीच गुन्हे दाखल केले जात आहेत. मोदींना आशीर्वाद देण्यासाठी लोक रॅलीत येत आहेत. त्यांना कोणीही बोलावत नाही. सरकारचे कार्यक्रम होतात. त्याला गर्दी होते. ती चालते. फक्त आमच्या कार्यक्रमांकडे बोट दाखवले जात आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी या सरकारची रित आहे, अशी टीका त्यांनी केली. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात 7 ते 8 हजार लोकांची गर्दी झाली होती. जालना, नाशिक, बीड या ठिकाणी झालेल्या सरकारी पक्षांच्या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. त्यांनी गर्दीचे कार्यक्रम केलेले चालतात, फक्त आम्हालाच नियम का दाखवले जातात?

वैचारिक उंचीही वाढली पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्या. पटोले यांनी आधी स्वत:ची उंची वाढवावी. केवळ शारीरिक उंची वाढवून चालणार नाही. तर वैचारिक उंचीही वाढली पाहिजे. मोदींवर टीका करण्या इतपत आपलं कर्तृत्व नाही आणि तशी क्षमताही निर्माण केलेली नाही. त्यामुळे क्षमतेनुसार आणि औकातीनुसारच बोलावे, अशी टीका त्यांनी पटोलेंवर केली आहे

डान्सबार, वाईन शॉप सुरू आहे तिथे रांगा चालतात

मंदिर सुरू करावे ही आमचीही मागणी आहे. त्याच्यावर अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहेत. या सर्वांचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. नियमाच्या चौकटीत हवं तर मंदिरे उघडा, पण मंदिरे उघडली पाहिजेत, असं सांगतानाच एकीकडे डान्सबार, वाईन शॉप सुरू आहे. तिथे रांगा चालतात. फक्त मंदिराच्या रांगा चालत नाहीत. मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडतात. त्याही चालतात. मंत्रालयाचे मदिरालय करायला हे सरकार निघालं आहे. पण मंदिरे चालू करत नाही. या सगळ्यावर प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांनी काय करायला पाहिजे, हे सांगणे लष्कराचे काम नाही !

News Desk

“हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या पण ते काम पूर्ण करा”

News Desk

“तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो”, श्रीनिवास पाटलांचं आश्वासन..!

News Desk