HW News Marathi
देश / विदेश

‘विरोधी पक्ष नेते दिल्लीत जो काही बॉम्ब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका’, राऊतांचा फडणवीसांना टोला  

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली होती. फडणवीसांच्या या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. तसंच, फडणवीसांनी दिलेला फोन टॅपिंगचा अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका निघाला त्याला वातही नव्हती, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२४ मार्च) दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी गृह सचिवांना फोन टॅपिंग संदर्भात ६.३ जीबीचा कॉल रेकॉर्डींग डाटा एका बंद पाकिटात दिला. आयपीएस आणि नॉन-आयपीएस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भातील रॅकेटची काही कागदपत्रेही दिली आहेत. त्यामुळं लेटरबॉम्बनंतर फडणवीसांच्या या पेनड्राइव्ह बॉम्बनं राज्य सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा असतानाच संजय राऊतांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

‘दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायलाच हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतीलं,’ असं राऊतांनी म्हटलं आहे.

‘विरोधी पक्ष नेते जो काही बॉम्ब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलं नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरु आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही,’ असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी बोलत करावं. खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.जर तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर आले. जर २५ ऑगस्ट २०२० पासून तो इतके दिवस का दाबून ठेवला कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोण यात लिप्त आहेत. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही दाबून ठेवला. संजय राऊतांकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत, असेही फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (२३ मार्च) दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी गृह सचिवांना ६.३ जीबीचा कॉल रेकॉर्डींग डाटा एका बंद पाकिटात दिला. आयपीएस आणि नॉन-आयपीएस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भातील रॅकेटची काही कागदपत्रेही दिली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

आपण केंद्रीय गृह सचिवांकडे एका बंद पाकीटात सर्व पुरावे दिले आहेत. तसंच त्यांच्याकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाची नक्कीच दखल घेऊ आणि सरकार या प्रकरणी योग्य ती करावाई करेल, असं आश्वासन त्यांनी दिल्याचं फडणवीस यांनी गृह सचिवांच्या भेटीनंतर सांगितलं.तसेच, गरच पडल्यास या प्रकरणी कोर्टात देखील जाऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दरम्यान, “डीजीपींनी सरकारला सादर केलेले काही इंटरसेप्ट्स स्वत: मुख्यमंत्र्यांनी देखील ऐकले होते, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाघा बॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट’ होणार नाही

News Desk

जैन मुनी शांतिसागर यांना बलात्कार प्रकरणी अटक

News Desk

राजनाथ सिंहांनी केली राफेलची पूजा, भारतीय वायू दलाच्या ताफ्यात

News Desk