HW News Marathi
महाराष्ट्र

“आता शांत आणि समाधानी वाटत आहे, माझे लोक घरी जातील “

मुंबई | ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घराकडे पोचविण्याच्या पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले असून यासंदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, तसे आदेशच मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत. दरम्यान, ऊसतोड मजूरांचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा संघर्ष आता संपला असून त्यांच्या व्यथा, वेदनांना विराम मिळाला आहे असे सांगत पंकजा मुंडे या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाल्याने सर्वत्र लाॅकडाऊन आहे अशा परिस्थितीत विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत, हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरली होती, गेल्या दोन तीन आठवड्यापासून त्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत होत्या. निर्णयास विलंब होत असल्याने त्या आक्रमक झाल्या होत्या, त्यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने आज दुपारी यासंदर्भातील आदेशच मुख्य सचिव अजाॅय मेहता यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केल्याने या लढयाला यश आले आहे. या आदेशामुळे त्या त्या अडकलेले सर्व कामगार आता आपापल्या मुळ गावी परतणार आहेत.

निर्णयाचे मनापासून स्वागत – पंकजा मुंडे

शासनाच्या या निर्णयाचे पंकजा मुंडे यांनी मनापासून स्वागत केले असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, लवादाचे नेते जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. यावर प्रतिक्रिया देतांना त्या म्हणाल्या की, आता शांत आणि समाधानी वाटत आहे, माझे लोक घरी जातील. ऊसतोड कामगारांचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला आहे, त्यांच्या व्यथा, वेदनांना विराम मिळाला आहे, ते आता स्वतःच्या घरी जाऊ शकतील. प्रशासनाने त्यांना सुरक्षितपणे घराकडे पोचवावे. कामगारांनी देखील प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे आणि आपापल्या घरी सुखरूप पोहोचावे तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्रीय गृहसचिवांना फडणवीसांनी ६.३ जीबीची कोणती पेनड्राईव्ह दाखवली?”, कॉंग्रेसचा सवाल  

News Desk

मनसे कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करा, मनसेची मागणी

News Desk

अखेर नितेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कणकवलीतून भरला उमेदवारी अर्ज

News Desk