HW News Marathi
महाराष्ट्र

जेवढे पाणी शेतात आहे त्यापेक्षा जास्त पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाहायला मिळाले – पंकजा मुंडे

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. पंकजा तब्बल आठ महिन्यांनंतर बीड जिल्ह्यात परतल्या आहेत. याच गोष्टीच्या आनंदात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, बँड वाजवत, फटाके फोडून मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं आहे

भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं जालना-बीड सीमेवर जंगी स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचं देखील भान कार्यकर्त्यांना राहिलं नाही.

पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबा यांच्या जन्म स्थानी सावरगाव येथे दसरा मेळावा आयोजित केला असून तो ऑनलाइन पद्धतीने सर्वांना पाहण्यास येणार आहे. मात्र कोरोनाच्या संकट काळात सावरगाव या ठिकाणी दसऱ्यास गर्दी न करता प्रत्येकांनी आपल्या गावात हा दसरा मेळावा साजरा करावा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

“मी सावरगावला जाऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आणि सर्वांनी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकायचे आहे. नेमकी पंकजा मुंडे या ठिकाणी कोणते संकल्प करणार आणि जनतेला कोणत्या विषयावर मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्यामध्ये अनेक मंत्री नुकसान पाहण्यासाठी आले राज्यात कुणीही नुकसान भरपाई मिळणार कशी हे सांगितलं नाही त्यामुळे दर दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली तर दिवाळीमध्ये पंचनाम्याची होळी करणार असेही त्या म्हणाल्या.

शेतीचे मोठे नुकसान झाले आहे हे सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, जेवढे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे त्यापेक्षाही जास्त पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाहायला मिळाले. त्यामुळे लवकरच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तरप्रदेश, बिहार रामभरोसे – नवाब मलिक 

News Desk

जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्री करा- छत्रपती संभाजीराजे

News Desk

अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकताच नाही; फडणवीसांची अधिवेशनापूर्वी सरकारवर हल्लाबोल

Aprna