HW News Marathi
महाराष्ट्र

खुप लोकांना वाटलं पंकजा ताई गेल्या, संपल्या!

बीड | भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज (२५ ऑक्टोबर) दसऱ्या मेळाव्यानिमित्त ऑनलाइन मेळावा घेतला. ऑनलाईन मेळावा असूनही राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक भगवानगडावर आले. आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोकं आले, असं सांगतानाच निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला आहे. त्यावेळी ‘कोण आली रे कोण आली… महाराष्ट्राची वाघीण आली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या.

आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही. बजेट कसं घ्यायचं आणि काम कसं करायचं हे मी जाणते. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, असं म्हणत पंकजा मुंडेंनी राजकीय विरोधकांना इशारा दिला आहे.

भगवान गडावर उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. कोण आली कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली, अशा जोरदार घोषणाबाजी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. ऊसतोड कामगारांसाठीच माझा कारखानाही मी उशिरा सुरू केला. कारण माझ्या कामगारांचा संप सुरू आहे. बोलणाऱ्याचं काय जातं, जा तुम्ही संप करा म्हणून सांगतात. मुंबईत बसून निर्णय होत नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना मारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच” किरीट सोमय्यांचा दावा!

News Desk

किरीट सोमय्यांचे आरोप ‘राजकीय चेटकिणी’सारखे; कॉंग्रेस नेत्याचा टोला

News Desk

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी

News Desk