HW News Marathi
महाराष्ट्र

“परळीची जनता फार हुशार! कोणाला किती उडू द्यायचे आणि कोणाची पतंग कधी कापायची हे चांगलचं माहीत” – पंकजा मुंडे

बीड। परळी नगरीत काँग्रेस चे राजकारण होते परळीत देशमुखांचे राजकारण होते, या परळी मतदार सांघात अनेक लोकांनी नेतृत्व केलं अनेकांना योगदान दिले आहे. या परळीच्या जडणघडणीत खूप लोकांचा वाटा आहे. परळीच्या राजकारणाची ती पिढी कुठे आहे असा सवालही यावेळी बोलतांना पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. तर पुढे बोलतांना पंकजा मुंडे खंत व्यक्त करत म्हणल्या की, आत्ता काय राजकारण सुरू आहे? मला राष्ट्रवादीच्या धनंज मुंडेंबद्दल मला टीकाच करायची नाही. कारण मला त्यांच्या वेव्हढी खालच्या पातळीला जाऊन काम करताच येणार नाही म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मी काम करणारी आहे, मला जनतेला सांगायचे आहे की तुमचा नेता थकला नाही, हुकला नाही, मी तुमच्या सोबत आहे. पुढे बोलताना पंकजा मुंडे असेही म्हणाल्या परळीची जनता ही फार हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचे व कोणाची पतंग कधी कापायची हे यांना चांगलच माहीत आहे. मी काही मतासाठी काम करत नाही तर आपल्या लोकांसाठी मी काम करत आहे. अशी भावना देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

माझा फाटका कार्यकर्ता प्रामाणिक पणे लढणार आहे, ही वानरसेना माझ्या सोबत आहे.पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणल्या की, समुद्र मंथनाच्या वेळी विष पिण्याचं काम या महादेवांनी केले आणि परळी ही महादेवाची नगरी आहे. तर अनेक लढाया बाकी आहेत आणि या लढाया मी लढणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणल्या. दोन वनवासी माझ्या राज्यात आहेत असा अहंकार रावणाला होता पण त्यांना सुद्धा वानर सेना होती. माझं त्यांना येवढच म्हणणं आहे की, दहा पाच लोक आहेत ज्यांना बील मिळालेत मात्र शेतकरी ,मजूर सामान्य जनता आहेत त्यांना अजूनही काहीच मिळाले नाही. ते बरोबर वेळ आल्यास आपली मताची ताकद दाखविणार असे देखील पंकजा मुंडे बीड मध्ये स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात म्हणाल्या.

माझा नारा स्वच्छ आहे माझा कार्यकर्ता स्वच्छ आहे. आणि माझा फाटकाच कार्यकर्ता नगर पालिकेच्या निवडणुकीत आपल्यासाठी येणार असल्याचे म्हटले तर आपल्याला जे काम करायचा आहे, ते सकारात्मक करायचे आहे असे ही पंकजा मुंडे यांनी परळी नगर पालिका निवडणुकीत आम्ही सज्ज असल्याचा इशारा विरोधकांना केला आहे. मुंडे साहेबांच्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनात या परळी साठी काम केले मी त्यांचा वारसा घेऊन काम करीत आहे.माझ्या काळात मी घेतलेल्या योजना मला लोक सांगतात जिथे जिथे मी जाते तिथे तिथे लोक मला सांगतात ताई तुम्ही हे काम केली

शासकीय योजनेच्या सोबत सामाजिक कार्यक्रम देखीक तेवढ्याच हिरिरीने राबवला आहे.तर माणसाचे काम बोलते की आपण कसे आहोत. तर परळीच्या जनतेची मान शरमेने खाली गेली या वाक्याला उजाळा देत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेना नाव न घेत टोला हाणला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आटपाडी डेपोला कुलुप, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक!

News Desk

गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

एवढा नामोहरम, जनतेपासून तुटलेला विरोधी पक्ष पाहिला नाही !

News Desk