HW News Marathi
महाराष्ट्र

हताश, थकलेल्या लोकांची देशाला गरज नाही !

बीड | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड येथील परळीत पार पडलेल्या प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. मोदींनी सभेदरम्यान जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यावरून विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. काही लोकांनी असे म्हटले की, आम्ही थकलो. हे थकलेले लोक तुमचे भले करणार का? असा सवाल उपस्थित करत नाव न घेता मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिदें यांच्यावर टीका केली. मोदींनी आज (१७ ऑक्टोबर) परळीचे भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचार सभेदरम्यान बोलत होते.

कलम ३७० हटविल्यानंतर अनेक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशविरोधात भूमिका घेतली. मात्र, देशविरोधात भूमिका घेणाऱ्यांना शिक्षा देण्याची महाराष्ट्रातील जनतेला संधी मिळाली आहे. असे म्हणत मोदींनी असे अप्रत्येक्ष विरोधकांवर टीका करत त्यांना विरोधकांना मतदान करून नका, आव्हान केले आहे. पुढे मोदी म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील तरुण वर्ष पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील वयोवृद्ध डोक्याला हात लावून बसले आहे. गेल्या पाच वर्षातील भाजपच्या कार्यशक्तीमुळे लोक आज आमच्यासोबत असल्याचे विश्वास मोदींनी सभेत बोलून दाखविला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • मतदान करण्याचे जनतेला आवाहन
  • बीडने गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासारखे मित्र दिले
  • जशी दिवाळी साजरी करतात तसेच लोकशाहीचा उत्सव साजरा करा
  • दलाललांची साखळी नष्ट करण्याचे काम भाजप सरकारने केले
  • येत्या ५ वर्षात १ कोटी बचत गटांना जोडले.
  • मराठवाड्यात २५ हजार कोटीचे रस्ते तयार होत आहेत.
  • रस्ते बाधण्यासाठी काम करणार, लोकांच्या घरी काम करणारे लोकांना बँकडून तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे म्हटले
  • संपूर्ण महाराष्ट्र २ हजार कोरड रुपये शतकऱ्यांच्या खात्या जमा झाले आहे, काही लोकांना तांत्रिक कारणामुळे प्रॉब्लम होत आहे त्यांच्या शेतकऱ्यांना देखील पैसे देणार आहो.
  • येत्या २०२२ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोचविण्याचा भाजप संकल्प
  • साडे तीन लाख कोड रुपये ‘हर घर जल’साठी खर्च करणार असल्याचे मोदींनी सांगितले आहे.
  • येत्या पाच वर्षात आम्ही ‘हर घर जल’ करणार आहोत, अशी भावना घेऊन आम्ही काम करणार आहोत
  • आम्ही देशातील प्रत्येक वर्गासाठी काम केल्यामुळे जनतेने आम्हाला लोकसभेत भरघोस मतांनी निवडून दिले.
  • देशाच्या भावना विरोधात या लोकांनी ऐवढे वक्तव्य केली की, संपूर्ण देशांनी त्यांचे वक्तव्य ऐकली आहे. देश या सर्वांना त्यांची जागा देणार आहे, मात्र, महाराष्ट्रातील जनते कडे ही पहिल संधी आली आहे की, या सर्वांना शिक्षा देण्याची वेळी आहे. या सर्वांना त्यांच्या कर्माचे फळ नक्की मिळणार आहे
  • काँग्रेसच्या यवा नेता सांगिताल की, कलम ३७० हा देशाचा अंतर्गत प्रश्न नाही असे म्हणाऱ्यांना तुम्ही माफ करणार का?, अशी लोकांना तुम्ही निवडून देणार का? असे म्हणत मोदींनी काँग्रेसला हविण्याचे आवाहन
  • आमच्या पक्षाचा जन्म झाल्यापासून कमल ३७० हटविण्याचा आमचा मानस आहे
  • कमल ३७० हटविण्याचा निर्णय, ही हत्या आहे, हा देशाचा काळा दिवसत आहे, भारतात लोकतंत्र आहे, राष्ट्रीय लोकतंत्राला धोका असल्याचे केला आहे. असे म्हणत मोदींनी राहुल गांधी, शरद पवार यांच्याव टीका
  • इतिहासात जेव्हा जेव्हा कलम ३७०ची चर्चा होईल तेव्हा तेव्हा या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा नाव नक्की येणार आहे.
  • आम्ही जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेऊन, तेथील नागिकांना मुक्त केले. त्यावेळी यांचा स्वार्थ जागा झाला.
  • एका बाजुला भाजपची कार्यशक्ती आणि दुसऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजुला स्वार्थ शक्ती आहे.
  • गेल्या पाच भाजपची कार्यशक्तीमुळे लोका आज आमच्यासोबत आहेत.
  • हे धकल्याले लोक तुमचे भल्ले करत का? नाही मग अशा लोकांना निवडून देऊ नका, असे आवाहन मोदींनी जनतेला केले आहे.
  • काही लोकांनी तर आम्ही थकलो असे, देखील म्हटले आहे असे म्हणत मोदींनी सुशील कुमार शिंदेवर टीका
  • काँग्रेस-राष्ट्रवादीला तरुण वर्ग सोडून जात आहे तर वयोवृद्ध डोक्या हात लावून बसले आहेत.
  • शेवट्या क्षणापर्यंत भाजपचा कार्यकर्ता महेनत करत होय, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्यकर्ता त्यांना सोडून का जात आहे, यांची चिंता केली पाहिजे
  • मला काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारांनी काळजी वाटत असे की, भाजपचे उमेदवार ऐवढे का, काम करत आहेत.पण त्यांना माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंशी जनता आहे.
  • बीडमध्ये नेहमीच भाजपचे सरकार आले आहे, मला वाटते की, आता रिकोड ब्रेक होईल
  • बाबा वैजणातचा आशिर्वाद संपूर्ण बीडवर राहिला आहे. आणि बीडचा आशिर्वाद नेहमी भाजपवर राहिला आहे.
  • बाबांचा आशिर्वाद आल्यावर आहे
  • मला एकसात दोन देवांचे दर्शन मिळाले, परळीत आल्यानंतर मला बाबा वैजणातचे दर्श केले, त्यानंतर मी परळीतील जनतेचे दर्शन केले
  • संतांची भूमी असलेल्या बीडचे मी आला आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोरक्या बहीण- भावाची एका तपानंतर घडली भेट

News Desk

भुजबळांना राज्य सरकारविरोधात भडकवण्याचा चंद्रकांत पाटलांचा प्रयत्न ?

News Desk

मुंबईमध्ये बुलेट ट्रेन होऊ देणार नाही- राज ठाकरे

News Desk