HW News Marathi
महाराष्ट्र

नवरात्रीच्या प्रसादातून १०० जणांना विषबाधा

सांगली। नवरात्रीच्या निमीत्ताने केलेल्या प्रसादातून तालुक्यातील उटगीजवळील निगडी बुद्रुक येथे १०० लोकांना विषबाधा झाली घटना घडली आहे. काही जणांवर उमदी, उटगी आणि माडग्याळ येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या सर्व जणांची प्रकृती ठिक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डी. जे. पवार यांनी दिली आहे.

दसऱ्याच्या निमत्तिताने शिऱ्याचा प्रसाद करण्यात आला होता. हा प्रसाद खाल्याने विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसाद खाल्यांनंतर अनेक जणांना उलटी, मळमळ, जुलाब होण्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यानंतर ताबडतोप लोकांना सरकारी तर काही जणांना खासगी रुग्णालयात भरती करवण्यात आले. या गावातील शंभरहून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. या प्रकणाची तपासणी आरोग्य विभाकडून सुरु आहे.

दसर्‍याच्या दिवशी गोडधोड आणि मांसाहारही केला जातो.”खंडेनवमीला मांसाहार आणि दसर्‍याला गोड नैवेद्य असतो. कदाचित दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने विषबाधा झाली असावी”, अशी शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. उमदी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली असून, पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रातलं सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, पंढरपूरात फडणवीसांनी उडवला राजकीय धुरळा !

News Desk

यांच्या बापाची पेंड आहे का? चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर निशाणा

News Desk

संजय राऊतांचे नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहील; भाजप आमदाराचा टोला

Aprna
देश / विदेश

ओडिशात ‘तितली’ चक्रीवादळामुळे ५७ जणांचा मृत्यू

swarit

भुवनेश्वर | ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (११ ऑक्टोबर)ला ‘तितली’ या चक्रीवादळ येऊन धडकले होते. या चक्रीवादळामुळे संपुर्ण परिसराला तडाखा बसला आहे. बंगालाच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्याने तितली या चक्रीवादळाने रौद्र रूप धारण धारण केले आहे. तितली या चक्रीवादळमध्ये आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात तितली चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रहिवाशांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ओडिशा सरकारने राज्यात हाय अलर्ड जारी करण्यात आला असून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना काही दिवसासाठी सुट्टी देण्यात आली आहे. लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरे तातडीने रिकामी करण्यास सांगितले होते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तितली या चक्रीवादळाच्या परिस्थितीची माहिती घेत आहेत.

 

Related posts

“…म्हणून भाजपचं कौतुक केलंच पाहिजे!”,राऊतांनी भाजपला डिवचले

News Desk

आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन! – मुख्यमंत्री

Aprna

#AirStrike : सिनेकलाकारांचा भारतीय वायु दलाला सलाम

News Desk