HW News Marathi
महाराष्ट्र

‘गृहखात्यावरून’ राजकारण; ‘त्या’ चर्चांना मुख्यमंत्र्यांनी दिला पूर्णविराम

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहखात्यावर नाराज असल्याची मोठया प्रमाणात चर्चा सध्या सुरू आहे. तर आज (शुक्रवार, 1 एप्रिल) या मुद्यावरून मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या नेत्यांविरोधात पुरावे सादर करून सुद्धा गृहखात्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण असं जरी असलं तरी गृहखात्यावरून सुरू असलेल्या ‘धुसफूशी’च्या त्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे.

याआधी महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही धुसफूस सुरू नाही. त्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे. तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. त्यामुळे याकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच आस्ते कदम भूमिका कुणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर आवळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागतील, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं होतं.

शिवसेना आणि गृहखाते यामध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. तर या भेटीवरून भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली, असे वृत्त वाऱ्यासारखे पसरत गेले. तसेच यावरून मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, या भेटीनंतर वळसे पाटील हे चांगले काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले. त्यामुळे ‘त्या’ बातम्यांचे मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे खंडन केले आहे. पण आता नवी चर्चा होताना पाहायला मिळते आहे. ही नवी चर्चा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी वळसे पाटलांची केलेली पाठराखण म्हणजे नवे संकेत मिळत असल्याची आहे. म्हणजेच आगामी काळात भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात एकमत झालं असावं, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनसामान्यात ‘हरेकृष्ण’ पाहणे हीच खरी ईशसेवा’! –  भगतसिंह कोश्यारी

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk

” सामान्यांचा श्वास गुदमरतोय, त्याची पर्वा कोणाला आहे का?”, सामना अग्रलेखातून केंद्रावर हल्ला

News Desk