HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अख्खा मेंदू राज्यात आहे, प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

पुणे | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन वस्तुस्थितीला धरून आहे. मला शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला दिल्लीत का जात नाही म्हणून विचारलं जातं. पण माझा लढा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अख्खा मेंदू राज्यात आहे, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली आहे. राज्यात काँन्ट्रॅक्ट फार्मिंग कायदा करण्यापासून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थांबवू शकलो नाहीत. कृषी हा राज्याचा विषय आहे. राज्यातील कायदा रद्द झाला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो. कायदा राज्यावर अवलंबून आगहे. तीन पायाच्या सरकारला हा कायदा रद्द करण्यात काय अडचण येत आहे? असा सवाल करतानाच जमिनी वाचवायच्या असतील तर काँन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा रद्द केला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि शेती मालकांचा संबंध काय? हे एकदा केंद्राने जाहीर केलं पाहिजे, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

यावेळी आंबेडकर यांनी एल्गार परिषदेबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली. एल्गार परिषदेतील भाषण समोर आलेलं नाही. तसेच या एल्गार परिषदेला मी महत्त्व देत नाही. अगोदरच्या एल्गार परिषदेचा हेतू वेगळा होता. समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी एल्गार परिषदेची स्थापना करमअयात आली होती. मी अध्यक्ष असताना एल्गार परिषद बरखास्त करण्यात आली होती. उरलेल्या एल्गार परिषदेशी आमचा संबंध उरलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वरुण सरदेसाई भाचा आहे म्हणून सूट देताय का?’ मनसेचा सवाल!

News Desk

अजित पवारांचे निकटवर्तीय रविराज तावरेंवर गोळी झाडणारे सापडले, बारामतीत अल्पवयीन तरुणासह ४ जणांना अटक

News Desk

विठूरायाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदनाचा लेप

News Desk