HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती आणि उपमुख्यमंत्र्यांची फक्त बारामतीपुरती, प्रकाश आंबेडकरांचा टोला

अकोला | राज्यावर कोरोनाचं संकट आहे. राज्य सरकारही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे प्रयत्न कमी पडत असल्याचंही चित्र निर्माण झालं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कोरोनाच्या प्रादुर्भावानं उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र शासन पूर्णपणे झोपलं आहे

सध्या महाराष्ट्र शासन पूर्णपणे झोपलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरतीच असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावलाय. यामुळेच उच्च न्यायालयच सर्व आदेश देत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी केंद्रातल्या मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. दुसऱ्या लाटेचं अपयश हे फक्त मोदींचा ममतांना पराभूत करण्याच्या अट्टहासामुळे असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त इव्हेंटमध्ये रस असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी केंद्राच्या लस महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लगावलाय.

फडणवीसांनी वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा, वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं. त्यांनी नागपुरात चार-पाच कोविड सेंटर उभारावेत, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरूनही हल्लाबोल केला होता. आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारकडून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता.

सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली होती. नवाब मलिकांना राज्य सरकारकडून बळीचा बकरा केलं जात असल्याचं आंबेडकर म्हणाले होते. एकूणच प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”, शालिनी ठाकरेंचा सवाल

Jui Jadhav

पुण्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात रुग्णांची संख्या १७ वर

swarit

“पवारांनीच मागील ५० वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला!”

News Desk