HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर जळजळीत टीका!

मुंबई। राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. आणि अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टोकाची टीका केलीये. एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि मंत्री आहे की जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ नाही’, असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. आज दादर मध्ये भाजपची कार्याकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले.

आपल्या काळात प्रकल्पांवर चर्चा होते

सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. पण, महाराष्ट्राच्या विश्वासहर्तेवर प्रश्न निर्माण झाले आहे. एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि मंत्री आहे की जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ नाही. आपल्या काळात प्रकल्पांवर चर्चा होते. आज चर्चा कशावर होते तर गांजा, हर्बल तंबाखूवर होते. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणुन यांची नोंद होईल, अशी टीका फडणवीस यांनी केली.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ

मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना सी. टी. रवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. आजचा मुख्यमंत्री पार्टटाईम आहे. फुलटाईम नाही. राज्यात फडणवीसांराखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहीत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही. राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे, अशी विखारी टीका भाजप नेत्याकडून आता करण्यात आली आहे.

त्यांनी केवळ भाजपला धोका दिला

तर या झालेल्या भाजपच्या बैठकीत सी. टी. रवी असंही म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासाचे काम होत नाही. राज्यातील जनतेने नरेंद्र आणि देवेंद्रच्या नावाने मतदान केलं होतं. सत्तेतच यायचं असेल विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा, आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे, असं आव्हान देतानाच 2019मध्ये जनतेने भाजपला मतदान केलं आहे. पण शिवसेनेने लोकांचा कौल झुगारला. त्यांनी केवळ भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे. संधी साधूंच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे. हा मतदारांचा अपमान आहे असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… नाहीतर जयंत पाटलांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार

News Desk

#CoronaVirus | राज्यातील १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द, शिक्षण विभागाचा निर्णय

News Desk

आज दिवसभरात राज्यात ८ हजार १५९ नविन कोरोनाबधित रुग्ण!

News Desk