HW News Marathi
महाराष्ट्र

पृथ्वीराज चव्हाणांचा आधी पैसे जमा करण्याचा सल्ला आणि आता अभिनंदन

सातारा | राज्यात लागू केलेल्या संचारबंदीनंतर राज्य सरकारने दुर्बल घटकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यावरुन भाजपने सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली. त्यांच्या याच टीकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संचारबंदीच्या काळासाठी राज्य सरकारनं दिलेल्या पॅकेज करणाऱ्या भाजप नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी संचारबंदीच्या काळासाठी पॅकेज जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला होता आणि आता थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना तिजोरी मोकळी असताना सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं ५४०० कोटी रुपयांचं पॅकेज थोड्यादिवसासाठी दिले आहे. आपण कोरोना साखळी तोडू, अशी अपेक्षा आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना, शिवभोजन थाळी, रिक्षाचालकांना आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय क्रांतीकारक आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो, असं चव्हाण म्हणाले आहेत.

भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्रीपणा लक्षात आलेला आहे. कोरोना आल्यापासून मी मागणी करतोय की जगातल्या प्रत्येक देशानं त्यांच्या तिजोरीतून अब्जावधी रुपयांचं पॅकेज जाहीर केली आहेत. मोदी सरकारनं पहिल्या लॉकडाऊनच्या टप्प्यात तटपुंजी मदत केली आहे. कामगार जे काम करत आहेत आणि ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना मदत केली पाहिजे ही मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे होती, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंटी आणि बबली पोहोचले असतील तर येऊ द्या, स्टंट करणे हे त्यांचे काम!, राऊतांचा राणा दाम्पत्यांना टोला

Aprna

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते !

News Desk

राज्यातील पूरस्थितीमुळे विरोधकांचा ईव्हीएमविरोधी मोर्चा पुढे ढकलला

News Desk