HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील पूरस्थितीमुळे विरोधकांचा ईव्हीएमविरोधी मोर्चा पुढे ढकलला

मुंबई | राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी २ ऑगस्ट रोजी ईव्हीएमविरोधात एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ईव्हीएमविरोधात सर्व विरोधक २१ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, राज्यभरात निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता २१ तारखेला होणार ईव्हीएमविरोधी मोर्चा पुढे ढकलला असून २८, २९ ऑगस्टदरम्यान हा मोर्चा होणार असल्याची माहिती आज (९ ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. २ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून अनेक आरोप केले होते. त्याचप्रमाणे, विरोधकांकडून ईव्हीएमविरोधात काढण्यात येणाऱ्या या मोर्च्यात जनतेने देखील सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. दरम्यान, हा मेळावा आधी २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आता २८, २९ ऑगस्टदरम्यान काढण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताक दिनी सजली विठुरायाची पंढरी

News Desk

‘आरे’साठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

पंढरपुरमध्ये रामदास आठवलेंच्या हस्ते शालेयवस्तूंचे वाटप

News Desk