HW News Marathi
महाराष्ट्र

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रवानगी आता थेट जिल्ह्यांच्या ठिकाणी करणार, जाणून घ्या का?

मुंबई | कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होतंच आहे. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे क्वॉरंटाईन विमानतळावरच करण्यात येते. परंतु आता क्वॉरंटाईनची क्षमता संपली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता विमानतळावरून प्रवाशांची थेट मुंबईबाहेर रवानगी होणार असल्याची शक्यता आहे. परदेशातून मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांना थेट त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी क्वॉरंटाईनसाठी पाठवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यासाठी मुंबईत जागा अपुरी पडत असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात महानगरपालिकेने राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली असून त्यासंदर्भातील परिपत्रक मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी काढले आहे.

मुंबईत कस्तुरबा रुग्णालयामध्ये परदेशातून येणाऱ्या आणि संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन केले जात आहे. मात्र, त्यावरचा ताण वाढत असल्यामुळे खासगी हॉटेलांनादेखील पालिकेकडून आणि सरकारकडून क्वॉरंटाईन सुविधा पुरवण्यासाठी हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मुबईच्या के.ई.एम रुग्णालयात आणि बाफकिन इन्स्टिट्यूटमध्येही चाचणी केंद्रे सुरु होणार आहेत अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. परदेशातून आलेल्या लोकांना १४ दिवस घरीच कॉरंटाईन (इतरांपासून अलग) करण्याच्या सूचना आहेत. मात्र, बरेचजण हे नियम पाळताना दिसत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासोबत इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण होत आहे. सद्यस्थितीची ही परिस्थिती पाहता आगामी काळात सरकार आता होम कॉरंटाईन बंद करण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मेल्यावर साहेबांना काय सांगू? मुख्यमंत्री शिवसेनेचा पण…”, शिवसेनेला आमदाराचा घरचा आहेर 

News Desk

‘आजपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरु’, काय आहे नियमावली?

News Desk

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

Aprna