HW News Marathi
Covid-19

दिल्लीत ‘आप’च्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवा !, भाजपची अण्णा हजारेंकडे मागणी  

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आता चक्क भाजपने एक ऑफर दिलीये. भाजप दिल्लीचे अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी सोमवारी (२४ ऑगस्ट) अण्णा हजारेंना एक पत्र लिहिले. या पत्रात आदर्श गुप्ता यांनी एक महत्त्वपूर्ण मागणी केली होती. “आम आदमी पक्ष भ्रष्टाचार करत असून तुम्ही दिल्लीत येऊन हे लोकांना सांगा”, अशी मागणी भाजपकडून अण्णा हजारांना करण्यात आली आहे. दरम्यान, आता अण्णा हजारेंकडून यावर काही प्रतिक्रिया येणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आदर्श गुप्ता अण्णा हजारेंना लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हणतात की, “तुमच्या नेतृत्वात आपने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. आम्हाला आठवते की २०११ साली तुम्ही दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि जनलोकपाल विधेयकाची मागणी करुन तत्कालीन सरकारविरूद्ध आमरण उपोषण केले होते. मात्र, आज तोच आप पक्ष स्वतः च भ्रष्ट्राचारात सामील आहे. तुम्हीच आता दिल्लीत येऊन हे लोकांना सांगा. ‘आप’च्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा.”

“तुमच्या आंदोलनाला दिल्लीसह देशभरातील कोट्यावधी लोकांनी पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर तुमच्याच नावाने लोकांनी पारदर्शक राज्य कारभाराची बाजू मांडत निवडणुका लढवल्या. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. ‘आप’ची स्थापना झाली. मात्र, आता ‘आप’च या भ्रष्टाचारात सामील आहे. त्यामुळे, आता अण्णा हजारेंनी पुन्हा दिल्लीत यावे. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी भाजपला आंदोलनात पाठिंबा द्यावा”, अशी मागणी भाजपकडून आदर्श गुप्ता यांनी पत्राद्वारे केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात येण्यास घातली बंदी 

News Desk

‘हिंदी ही राष्ट्रभाषा’ राज्य सरकारच्या ‘या’ जीआरमुळे नवा वाद

Aprna

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही दिशाभूल केल्यास कारवाई करणार

News Desk