HW News Marathi
महाराष्ट्र

तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक कोरोना बाधित होतील असा अंदाज राजेश टोपेंची माहिती!

मुंबई। आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली. कोरोनाचा कोणताच मृत्यू लपवला नाही हे ठामपणे सांगतो, असं टोपे म्हणाले. तसंच केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. केरळमध्ये ओनम हा सण साजरा झाला. तिथे गर्दी झाली होती. त्यामुळे एकाच दिवसात मोठी रुग्णसंख्या वाढली. मी स्वत: केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी फोन करुन बोललो. 31 हजार केसेस एकाच दिवसात आल्या. तिसऱ्या लाटेची सुरुवात केरळमधून झाली असं समजायचं का? त्यावर त्यांनी दोन कारणं सांगितली, असं टोपे म्हणाले.

आता तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होतील

राज्याच्या मंत्रिमंडळाचीब (26 ऑगस्ट) बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते.कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते, दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक बाधित झाले होते. आता तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होतील असा अंदाज असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं.

ऑक्सिजन प्लान्टच्या संख्येत वाढ करत आहोत

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील अनेक रिक्त जागा 100 टक्के भरत आहोत. तिसऱ्या लाटेसाठी आर्थिक तरतूद केली आहे तसंच एशियन बँकेकडे 5 हजार कोटींच्या कर्जाचीही मागणी केली आहे, असं राजेश टोपेंनी म्हटलं.राज्यातील ऑक्सिजन प्लान्टच्या संख्येत वाढ करत आहोत. एक हजार अँब्युलन्स खरेदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर ॲम्ब्युलन्स असतील, अशी माहितीही टोपेंनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणत्याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार नाही! – दीपक केसरकर

Aprna

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत आहे का?पवारांनी सुनावलं!

News Desk

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे भाजपने रणसिंग फुंकले

News Desk