HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपमधील घुसखोरांनी माहौल बिघडवला संजय राऊत यांची पुन्हा सडकून टीका!

मुंबई। पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात. वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा टोला लगावला. गेल्या दोन वर्षापासून अती झालं. महाराष्ट्रात आणि देशात बांगलादेशी घुसतात संपूर्ण देश खराब करतात. भाजपमधील घुसखोरांनी तसंच केलं आहे.

शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत

भाजपच्या शुद्धीकरणाची गरज आहे. हा खूप मोठा पक्ष आहे. हिंदुत्वासाठी या पक्षाने मोठं काम केलं आहे. आम्ही 25 वर्षे त्यांच्यासोबत होतो. त्यांचं योगदान आम्ही जाणून आहे. पण ज्यांना हे माहीत नाही, जे बाहेरून आले आहेत, ते लोक शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. देशासाठी बनलेला कायदा आहे. मग ती ईडी असो की सीबीआय असो. आम्ही जे आज लिहिलं. त्यात तथ्य आहे. आणि देशभरात त्यावर मंथन चालेल आणि चालणार, असं ते म्हणाले.

भाजपमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी माहौल बिघडवला

आता कोणी तरी बाहेरचा माणूस येतो शिवसेना भवनावर दगड मारू म्हणतो, कोणी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारू म्हणतो. हे मूळ भाजपचा माणूस बोलणार नाही, हे बाहेरचे बाडगे बोलतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे कधी बोलणार नाहीत. हे सगळे बाहेरून आलेले लोकं आहेत. महाराष्ट्रात, देशात बांगलादेशचे घुसखोर आणि पाकिस्तानचे घुसखोर हैदोस घालतात आणि आपण त्यांच्याविरोधात कारवाया करतो. महौल बिघडवतात. तसंच भाजपमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी माहौल बिघडवत आहेत, असं ते म्हणाले.

कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने व्यक्तिगत दुश्मनीसाठी काम करू नये

केवळ वैचारिक मतभेद असतात. मिस्टर राणेंनी जे सुरू केलं. त्याला वैचारिक मतभेद म्हणत नाहीत. ते वैयक्तिक दुश्मनी काढत आहेत. कोणीही कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने व्यक्तिगत दुश्मनीसाठी काम करू नये. तुम्ही तुमचं विधायक काम करा. तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढत आहात. प्रत्येक राज्यात ही यात्रा सुरू आहे. कोणत्या राज्यात वाद झाले. केवळ महाराष्ट्रात का? याबाबत भाजच्या नेत्यांनी कधी विचार केला का? तुमच्यात एवढी गुर्मी असेल तर गाझीपूरमध्ये शेतकरी बसले आहेत. जाऊन त्यांच्यासोबत बोला, असा हल्ला त्यांनी चढवला.

सभ्य भाषेत टीका असेल तर स्वीकारली जाईल. टीकेला धार असेल तर तीही स्वीकारली जाईल. तुम्ही कमरेखालची टीका केली तर याद राखा. कमरेखाली तुम्हीही आहात. आमच्याशी भाषेशी बरोबरी करू नका. आम्ही लिहिणारे बोलणारे आहोत आणि सर्वकाही करणारे आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध ?, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

News Desk

महाभकास आघाडीच्या ३ चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली – चंद्रकांत पाटील

News Desk

तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्यावर इन्कम टॅक्सची छापेमारी

News Desk