HW News Marathi
महाराष्ट्र

गेहलोत-ठाकरे सदिच्छा भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (५ जानेवारी) ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी जावून सदिच्छा भेट घेतली. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. या दोघांच्या भेटीमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संदेश घेऊन आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

गेहलोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महाविसआघाडी या नव्या राजकीय समीकरणाचे कौतुक केले आहे. मात्र, स्वत: उद्धव ठाकरे यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. अशोक गेहलोद हे मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार ही भेट झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. अशोक गेहलोत आणि उद्धव ठाकरे भेटीदरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर गेहलोत हे मातोश्री बाहेर आल्यानंतर त्यांना माध्यमांनी भेटीसंदर्भात विचारल्यावर ते म्हणाले की, “आम्ही दोघांनी आमच्या राज्यातील राजकीय गप्पा मारल्या. आणि महाराष्ट्रातील महाविकासआघाडी ही पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या भेटीनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भेटीचा आनंद व्यक्त केला. “राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांना भेटून, संवाद साधून आनंद वाटला. महाराष्ट्र आणि राजस्थानमधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल.” असा विश्वास त्यांनी ट्विटमधून व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुहास कांदे-छगन भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासनाला पाठवली कागदपत्रे

News Desk

चंद्रकांत पाटलांनी या प्रकरणात पडू नये, नाही तर उघडे पडाल!; राऊतांची धमकी

Aprna

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड ?

News Desk