HW News Marathi
महाराष्ट्र

“पहाटेच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येणार”, राजू शेट्टींचं सूचक विधान

पंढरपूर | राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप हे सरकार कसं पडेल याचा प्रयत्न करत आहेत. यावरुन आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठं विधान केलं आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारर संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सचिन पाटील यांना आपली उमेदवारी दिली आहे.

सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी खुद्द राजू शेट्टी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधातील भाजपची ही नुरा कुस्ती आहे. पहाटेच्या शपथविधीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार आहे, असा खळबळजनक दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.

लाॅकडाऊनच्या काळात ठाकरे सरकारनं वीज बिल माफ करतो म्हणून आश्वासन दिलं होतं. पण सरकारने ते आश्वासन पाळलं नाही. अशा सरकारला आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. इथं शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. मात्र सरकारमधील मंत्री घरावर कोट्यावधी रूपये खर्च करत आहेत. सरकारमध्ये आता नैतिकता शिल्ल्क राहिली नाही, असा आरोप त्यांनी यावेेळी केला आहे.

खरंतर सरकार पडणार आहे याची अजित पवारांना जाणीव आहे. कधी आणि कसं पडणार हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळं त्यांनी उगाच खोटा आव आणू नये, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. तर आता राजू शेट्टी यांच्या वक्तव्यामुळं राजकिय वर्तुळात अनेेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजू शेट्टी असं का म्हणाले याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘शिवाजी पार्क’वरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही का?

Manasi Devkar

मंत्रालयासमोर सरकारी कर्मचा-याचा आत्मदहनचा प्रयत्न

News Desk

महानरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप जण आले आणि गेलेही, अनिल परबांचा फडणवीसांना टोला 

News Desk