HW News Marathi
महाराष्ट्र

…तर राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खाण्याची तयारी ठेवावी !

कोल्हापूर | कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे. “कडकनाथ प्रकरणी राजू शेट्टी यांनी माझ्यावर केलेले आरोप जर ते सिद्ध करू शकले नाहीत तर राजू शेट्टी यांनी भर चौकात विष्ठा खावी”, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे. ते रविवारी (१ सप्टेंबर) कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी वापरलेल्या अत्यंत खालच्या पातळीच्या भाषेवरून मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

“कडकनाथ प्रकरणी राजू शेट्टी व त्यांचे समर्थक निव्वळ राजकीय द्वेषातून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. ते माझ्यावर तथ्यहीन आरोप करत आहेत. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिध्द करावेत. मी कोल्हापुरातील बिंदू चौकात यावर जाहीर चर्चा करण्यास तयार आहे. कडकनाथ घोटाळा प्रकरणात माझा कोणताही संबंध असल्याचे सिध्द झाले तर मी राजीनामा देईन. मात्र, जर ते माझ्यावरचे आरोप सिध्द करु न शकले नाहीत तर राजू शेट्टी यांनी भर चौकात विष्ठा खाण्याची तयारी ठेवावी”, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे. “सदाभाऊ खोत हे कडकनाथ घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

News Desk

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम

News Desk

गणेशोत्सवाआधी अमृता फडणवीसांचं नवं गाणं होणार रिलीज!

News Desk