HW News Marathi
महाराष्ट्र

आरोग्य सेवेचे खापर फोडताना हे लक्षात घ्या की आरोग्यमंत्री शिवसेनेचेच होते – राम कदम

मुंबई | गेल्या ५ वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, अशी शिवसेनेनं तत्कालिन फडणवीस सरकारवर टीका केली होती. शिवसेनेनं आजच्या सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्यावर टीका केली होती. परंतु भाजप आमदार राम कदम यांनी त्यावर प्रतिक्रिया देत फडणवीस सरकारच्या काळात आरोग्यमंत्री हे शिवसेनेचेच असल्याचं म्हणत टोला लगावला आहे.

 

“आरोग्य सेवेचा बोजवारा उडल्याचं खापर आधीच्या सरकारवर फोडताना संजय राऊन हे विसरले की, तेव्हा आरोग्यमंत्री शिवसेनेचेच होते. यांना स्मृतिभ्रंश झालाय की जनतेचं लक्ष स्वतःचं अपयशापासून झाकण्यासाठी की सुशांत सिंह प्रकरणात मोठे नेते, ड्रग माफीयांना वाचवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही गोष्ट तयार केली आहे,” असं म्हणत राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

“पुण्यात टीव्ही 9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर या तरुण पत्रकाराला वेळीच रुग्णवाहिका न मिळाल्याने दिरंगाईत प्राण गमवावा लागला. रायकर यांच्या मृत्यूने पत्रकारांमध्ये चीड आणि संताप निर्माण होणं साहजिक आहे. इतक्या ओळखीपाळखी असतानाही पत्रकार आपल्या सहकाऱ्यास वेळेवर मदत करु शकले नाहीत, तेथे इतर सामान्य लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.”

तसेच कोरोना काळात पुरेशा आरोग्य व्यवस्था नसण्याला फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. अग्रलेखात म्हटलं आहे, “वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी भरती आणि सुविधा योग्य निर्माण केल्या असत्या तर आजची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आली असती. गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज तात्पुरत्या जम्बो सुविधा उभारण्याची गरज कमी लागली असती.”

“विरोधी पक्षांच्या टीकेचा आरोपांचा मुख्य भर जम्बो कोव्हिड केंद्रावर आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही,” असंही यात नमूद करण्यात आलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत लावला उपमुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ

News Desk

शरद पवारांच्या नावे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा सरकारचा विचार

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. नरेश पाटील यांच्या नेमणुकीची शिफारस ?

Gauri Tilekar