HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवार यांनी NDA सोबत यावे, आठवलेंचा पवारांना सल्ला

मुंबई | देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवार यांनी NDA सोबत यावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला. शरद पवार केंद्रीय मंत्रिमंडळात आले तर त्यांचा अनुभव देशासाठी मोलाचा ठरणार आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या फायद्यासाठी शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं असं माझं व्यक्तिगत मत आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणूक भाजपाने स्वबळावर लढवली असती तर भाजपाला १४० जागा मिळाल्या असत्या. काही जागा कमी पडल्या असत्या तर आम्हीच शरद पवार यांना विनंती केली असती असंही रामदास आठवलेंनी म्हटलंय. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आणखी काय म्हणाले आहेत रामदास आठवले?

राज्यात शिवसेनेच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आहे. शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढायला हवा. राज्यात अनेक निर्णयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सहभागी करुन घेतले जात नाही. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असलं तरीही शिवसेना इतर दोन पक्षांचं ऐकत नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा काढून घ्यावा. देशाच्या भल्यासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी शरद पवारांनी एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यावा. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भवितव्यासाठी शरद पवार यांनी शिवसेनेसोबत राहू नये असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील मृत्यूदर कमी करणे हेच सर्वात मोठे आव्हान !

News Desk

ऑस्ट्रेलियाच्या खासदाराची अजब मागणी, चक्क योगींनां मागितलं उधारीत!

News Desk

‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा’, राष्ट्रवादीचा भाजपवर घणाघात!

News Desk