HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूर पोटनिवडणूक बिनविरोध करायचं भाजपने ठरवलेलं, पण… – रणजितसिंह निंबाळकर

पंढरपूर | राज्यात सध्या निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक येऊ घातली आहे. या निवडणूकीतही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत असणार असं दिसून येत आहे. यावरच, भाजपचे माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक वक्तव्य केले आहे. “आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक भाजपला बिनविरोध करायची होती. त्याबद्दल प्रशांत परिचारक यांनाही कळवले होते.

मात्र राष्ट्रवादीने भारत भालके यांच्या पत्नीला संधी दिली असती, तर भाजपची बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी होती. परंतु राष्ट्रवादीला ही भावना कळली नसल्याचा आरोप भाजपचे माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची धुरा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ते तळ ठोकून आहेत.

“विरोधक पोटनिवडणुकीत मृत्यूचे भांडवल करुन अनुकंपाच्या नावाखाली जागा भरण्यासाठी मतं मागायला येतात, हे साफ चुकीचे आहे. आपल्याला लोकांना न्याय देता आला पाहिजे. लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडता आले पाहिजेत. अनुकंपाखाली जागा भरायला हे काय एसटी महामंडळ नाही” अशा कडक शब्दात निंबाळकरांनी विरोधकांना सुनावले. तसेच माढ्याची जागा सोलापूरच्या जनतेने ज्या पद्धतीने शरद पवारांकडून काढून घेतली, तशी पंढरपूरची जागाही पुन्हा एकदा त्यांना देण्याची चूक जनता करणार नाही, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

“मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहे. २०१४च्या आधी पंढरपूर कसे होते, त्यानंतर २०१४पासून भाजपच्या काळामध्ये रस्त्यांसह विविध विकास कामे झाली आहेत. पांडुरंग हा गरिबांचा देव आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विठ्ठलभक्त असल्याचा दावा नाईक-निंबाळकर यांनी केला आहे.

“पंढरपूरला येणारे पाणी बारामतीला चोरुन नेले”

“दिवंगत आमदार भारत भालके आपले चांगले मित्र होते. २०१४पासून ३५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी आपलाही वाटा आहे. राष्ट्रवादी गावच्या पाणी योजनेमध्ये दोन टीएमसी पाणी देतो, असे सांगत आहेत. मात्र राज्य सरकारच्या बजेटमध्ये योजनेसाठी एक रुपयाची तरतूद केली असती तर भारत नानांना श्रद्धांजली ठरली असती” अशी टीका निंबाळकर यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता “बारामती येथील नेते पाणी चोर आहेत. पंढरपूरला येणारे पाणी बारामतीला चोरुन नेले आहे. त्यामुळे हे पाणी चोर पंढरपूरला पाणी देणार का” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलांना शालेय शिक्षणाबरोबर चारित्र्य संपन्न घडवा! – उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

News Desk

बुरमराहच्या ‘नो बॉल’वर जयपूर पोलिसांची फ्री हिट

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या – जयंत पाटील

News Desk