HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट ?

मुंबई | राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची युवा नेता आदित्य ठाकरे आणि शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढून देण्याची मागणी केली होती. मात्र, “राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार,” दिल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितेल. यामुळे मुदतीस सरकार स्थापन करण्यास शिवसेना अपयशी ठरली आहे. मात्र, “राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याची इच्छा,” देखील आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी अवघे २४ तास मिळाले होते. मात्र, या काँग्रेसच्या पत्रात शिवसेनेला पाठिंबा दिल्ल्याचा उल्लेख केला नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पुढेही चर्चा करणार असल्याचे पत्रका म्हटले आहे. यामुळे शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्यानंत राज्यात राष्टपती राजवटी लागू ताट शक्यता वर्तवली जात आहे. यानतंर तब्बल तीन तासानंतर दिल्लीत काँग्रेसची बैठक संपली. मात्र, या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित निर्णय घेईल, असे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

महायुती म्हणून आम्हाला निवडणुकीत जनादेश मिळाला. मात्र, शिवसेना आमच्यासोबत सरकार स्थापन करून इच्छित नाही. त्यामुळे भाजप सरकार स्थापन करू शकत नाही,” असे दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (१० नोव्हेंबर) राज्यापालांना भेटीदरम्यान सांगितले. यानंतर राज्यपालांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटात राजकीय घडामोडींना वेग आला होता. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (११ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले की, शिवसेनेविरोधात भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप केला होता.

मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

निवडणुकीत आरपीयआय, रयत, रासप, भाजप आणि शिवसना यांच्या महायुतीतील जनादेश मिळला होता. मात्र, मुख्यमंत्री पदवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्स्खेच सुरू होती. पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा, देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीमध्ये झालेल्या अनौपाचारीक गप्पांमध्ये केला होता. यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरून हटून बसली होती. निवडणुकीपूर्वी शिवसेनेला आडी वर्षाचा मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समान वाटपचा फॉर्म्युला, असा कोणताही झाला नव्हता, असे फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी – नवाब मलिक

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत – संजय राऊत  

News Desk

‘आव्हान-२०१७’ आपत्ती व्यवस्थापन शिबिरासाठी स्वारातीम विद्यापीठाचा संघ कोल्हापूरला रवाना

News Desk