HW News Marathi
महाराष्ट्र

रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांना सुनावलं! फडणवीसांच्या काळात मुंबईत असुरक्षित वाटलं नाही का ?

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईत राहणे कठीण असल्याचे ट्विट केले होते. त्यावर रेणुका शहाणे यांनी त्यांना ट्विट करत प्रश्न विचारला आहे.”फडणवीसांच्या काळात एलफिन्स्टन पूल कोसळला होता. त्या दुर्घटनेत असंख्य लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा अमृता फडणवीस यांना मुंबईत असुरक्षित वाटलं नाही का?, असा स्पष्ट सवाल त्यांनी अमृता फडणवीस यांना विचारला आहे.

सध्याच्या परिस्थितीत मुंबई सुरक्षित वाटत नाही, अरसुक्षिततेची भावना निर्माण होते, असं वक्तव्य काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या ट्विट विरुध्द अनेक स्तरांतून त्यांच्यावर टीका केल्या जात होत्या. वरुण सरदेसाई, प्रियंका चतुर्वेदी यांनीही त्यांना पलटवार केला होता. आणि आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे आता गृहमंत्री कुठे आहेत?”

News Desk

महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प – नाना पटोले

News Desk

कंगनाचा विषय ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठीच, गुलाबराव पाटलांचा टोला

News Desk