HW News Marathi
महाराष्ट्र

“शर्जिलसाठी पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध?”, ठाकरे सरकारविरोधात भाजप आक्रमक 

मुंबई | राज्य सरकारने नुकतीच शिवजयंतीच्या निमित्ताने एक नियमावली जारी केली आहे. याच पार्शवभूमीवर, आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.”छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यावर निर्बंध घालणाऱ्या महाआघाडी सरकारने आपला खरा ‘रंग’ दाखवला आहे. हिंदू समाज सडा हुवा है म्हणणाऱ्या शर्जिल व एल्गार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून कार्यक्रमासाठी पायघड्या. मात्र, छत्रपती शिवरांयाच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करायला बंधने राज्य सरकार घालते”, अशा शब्दांमध्ये केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला सुनावले आहे.

केशव उपाध्ये याच पार्श्वभूमीवर थेट शिवसेनेवर बोचरी टीका करताना म्हणतात कि, “सत्तेसाठी शिवसेनेने अनेकदा काँग्रेस – राष्ट्रवादी पुढे लोटांगण घातले आहे. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’चा नवा प्रयोग सादर केला आहे.” त्यापुढे याबाबत सरकारला सवाल करताना केशव उपाध्ये म्हणतात कि, “धार्मिक भावना भडकवणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी देताना आघाडी सरकार मागेपुढे पाहत नाही. मात्र शिवजयंती राज्यकर्त्यांच्या डोळ्यात का खुपते?”

केशव उपाध्ये पुढे म्हणतात, “शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर आघाडी सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. दारूची दुकाने, नाईटलाइफ, बार सुरु करण्यास परवानगी देताना सरकार गर्दीचा विचार करीत नाही. परंतु, शिवजयंती साजरा करताना कोरोनाच्या नावाखाली अनेक अडचणी आणल्या जात आहेत”, असाही आरोप उपाध्ये यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेना आता भाजपच्या या आक्रमक पावित्र्याला काही प्रत्युत्तर देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“….तर या विरोधात कोर्टात चॅलेंज करणार” – समीर वानखेडे

News Desk

उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

News Desk

मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला‘जय महाराष्ट्र’ केला! विखे पाटील

News Desk