HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादहून रस्त्याला यायचं म्हटलं तर प्रथम अंग चेपायची किंवा डॉक्टरची व्यवस्था करावी लागते !

जळगाव | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जळगावातील चोपडा तालूक्यातील चोपडा सहकारी सुतगिरणीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवादही साधला. “जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. औरंगाबादहून रस्त्याला यायचं म्हटलं तर प्रथम अंग चेपायची किंवा डॉक्टरची व्यवस्था करावी लागते”, असे म्हणत अप्रत्य़क्षरित्या रस्त्यांची झालेली दुरावस्थाही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

“आज आम्ही हेलिकॉप्टरने आलो पण माझी नेहमी इच्छा असते की, जिल्ह्यात गाडीने जावे. कारण रस्त्याने जात असताना शेतीच्या परिस्थितीची माहिती घेता येते. मात्र, औरंगाबादहून जळगावला रस्त्याने यायचं म्हटलं तर प्रथम अंग चेपायची किंवा डॉक्टरांची व्यवस्था करावी लागते. जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे पण आता सुदैवाने सरकार बदलले आहे. त्यामुळे लवकरच बदल होतील”, असा दावाही यावेळी शरद पवार यांनी केला.

शेतकऱ्यांबद्दल कायमच आपूलकीची भावना असणाऱ्या शरद पवारांनी पुढे “मला सगळे म्हणतात की, मी पिकवणाऱ्यांचा विचार जास्त करतो. हो, हे खरे आहे. कारण पिकवणारा जगला तर खाणारे जगतात. सध्या देशात शहरी संस्कृतीकडे कल आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांविषयी दृष्टिकोन वेगळा आहे. शेतकरी जास्त पिकवेल आणि खाणाऱ्यांची गरज भागेल, असा दुहेरी प्रोग्रॅम राबविण्याची सध्या गरज आहे. शेतीमध्ये गुंतवणुकीची गरज आहे. या गुंतवणुकीमुळे बेकारी दूर करण्यासाठी देखील मदत होईल. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्याच्या हिताचाच विचार करायचे ठरवले आहे असे आश्वासनही यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांना आणि जनतेला दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी नेत्यांच तोंड गप्प का?

News Desk

“जिथे पूर परिस्थिती होती तिथे अजूनही कोरोनाचं संकट घोंगावतये” – उद्धव ठाकरे

News Desk

विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय, ईडीच्या छाप्यावरुन कॉंग्रेसची प्रतिक्रिया 

News Desk