HW News Marathi
महाराष्ट्र

Rohit R R Patil Exclusive : आबांची पुण्याईही आमच्या पाठिशी राहणार !

सांगली | “या तालुक्यावर आम्ही निवडणूक विकासच्या मुद्द्यावर लढवतोय, आबाचे कर्तृत्व मोठे आहे. आबांची पुण्याईही आमच्याच पाठिशी उभी नाही, तर मग काय आमच्या विरोधकांच्या पाठिशी उभी राहणार का,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आबांचे चिरंजीव रोहित पवार यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना उभा केला आहे. “आबांची पुण्याईही आमच्या पाठिशी राहणार”, असा विश्वास देखील एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे.

रोहिल पाटील एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटले की, आबांची पुण्याची आमच्या पाठिशी आहे म्हणून आम्ही थांबलो नाही, तर विरोधकांपेक्षा आम्ही जास्त कामे आम्ही केले, असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. या मतदार संघात गेल्या साडे चार वर्षात आम्ही चांगले काम केले नसते, तर आम्हाला निवडणुकीसाठी असलेले पोषक वातावरण नसते. आज आमच्या कामाच्या जोरावर निवडणुकीसाठी पोषक वातावरण मिळाले असल्याचे रोहित पाटील यांनी एच. डब्ल्यू.मराठी बोलताना स्पष्ट केले आहे.

त्यावेळी तालुक्यात पाणीहा जिवाळ्याचा प्रश्न होता !

तासगाव कवंठमहाकाळ हा दुष्काळी भाग आहे. येथे पाणी हा जिवाळ्याचा प्रश्न आहे. लोकांना शेतीसाठी पाणी या प्रयत्नात आबा नेहमी राहिले. आता एक सुतगीरन सहकारी संस्था आहे, तेथे तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. पण, सहकार जाळे आम्ही उभे करू शकलो नाही हे मान्य आहे. पण, या तुलक्यातील जिवाळ्याचा प्रश्न पाणी होता. पाण्यासाठी आबा तत्पर राहिले. ठेभू योजना असेल, महिशा योजना असेल, आरफळ योजना आणि पुंदी योजना असेल, या अनेक योजनांसाठी आबा प्रयत्नात राहिले, असल्याचे रोहित पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या भागात पाणी कसे पोहचेल यासाठी ते प्रयत्नशील होते, असा दावा देखील रोहितने यावेळी सांगितले आहे.

माझी तुलना आबाशी करून नका !

“मी तुलने फारे लक्ष देत नाही, कारण असे की, ३५ ते ४० वर्षानंतर राजकारणानंतर लोकांनी आबाकडे ज्या पद्धतीने बघितले. त्या पद्धतीने माझ्याकडे पहिल्या राजकारणातील प्रवेशाकडे तसे पाहिले बघितले जाऊ नये. ” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आबांचे चिरंजीव रोहित पवार यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केले आहे. रोहित पवार एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटले की, आता लोक अपेक्षा करणार ते सहाजिक आहे. मी त्या पद्धतीने वागले पाहिजे, त्यापुढेही मी त्यांची काळजी घेत घेईन, असे यावेळी ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात ‘मिशन ट्वेंटीएट’

Aprna

नीरव मोदीच्या जमिनीवर शेतकऱ्यांचा कब्जा

News Desk

आज अधिवेशनात सावरकरांच्या अभिवादनाचा ठराव मंजूर होणार का?

Arati More