HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन अहिर स्वतःची ताकद निर्माण करण्यात अपयशी ठरले !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज (२५ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, सचिन अहिर यांचा शिवसेनाप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत मोठा धक्का आहे. दरम्यान, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सचिन अहिर यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर “सचिन अहिर हे आत्मविश्वास नसलेले नेते आहेत. स्वतःची ताकद निर्णय करण्यात अपयशी ठरले म्हणूनच त्यांनी पक्षांतर केले”, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

“सचिन अहिर हे सद्यस्थितीवर मात करू न शकले नाहीत. म्हणूनच आता ते प्रवाहासोबत जात आहेत. तसेच स्वतःची ताकद निर्माण करण्यात अपयशी ठरले. म्हणून त्यांनी पक्षांतर केले आहे. त्यांचा स्वतःवर विश्वास नाही. सचिन अहिर हे आत्मविश्वास नसलेले नेते आहेत. म्हणूनच त्यांनी पक्षांतर केले”, असे नावं मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता सचिन अहिर यांच्या शिवसेनाप्रवेशानंतर नवाब मलिक यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी विधेयकाला विरोध करणारे हेच ते दहशतवादी!

News Desk

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा!

News Desk

“काहीतरी बोलून केवळ लोकांचे लक्ष वेधण्याचे काम”, राज ठाकरेंकडे रोख ?

News Desk