HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी मकरंद अनासपुरे, इंदुरीकर महाराज यांची नावे सदाभाऊ खोतांनी राज्यपालांना सुचवली

मुंबई | रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज (२५ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्याची यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांकडे सादर केली आहे. रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे सुचवण्यात आलेली असून, तसे पत्र राज्यपालांना दिल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

राज्यात विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ जागा रिक्त आहेत. या जागांमध्ये विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर संधी देण्याची परंपरा आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांची नावे सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांना सुचवली आहेत.

राज्यात लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांना वाढीव रकमेची बिले देण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २० मार्चपासुन लाॅकडाऊन सुरू करण्यात आले व लगडून मुळे व्यापारी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. असे असताना लाॅकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल ३०० युनिटचे देण्यात आले देण्यात आले. तरी वाढीव वीज बिल तात्काळ माफ करणे बाबत शासनाचे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली.

राज्यातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ अतिवृष्टी गारपीट नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासुन पावसाने जोरदार हजेरी लावली शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नुकसानीमुळे शेतीसाठी झालेला खर्च वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे व राज्यातील शेतकऱ्यांची चालू पीक कर्ज माफ करून आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी विनंती सदाभाऊ खोत यांनी केली.

महाराष्ट्रामध्ये राज्यपाल आमदारकीच्या १२ जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामध्ये विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर संधी देण्याची परंपरा आहे. राज्यांमध्ये अनेक नामवंत आहेत की ज्यांना आजपर्यंत कुठे संधी मिळालेले नाही. अश्या व्यक्तिंचे गेले अनेक वर्ष आपआपल्या क्षेत्रात काम सुरू आहे. तरी अशाच काही वैशिष्टपुर्ण व्यक्तिंची नावे राज्यपालांना सदाभाऊ खोत यांनी सादर केली.

नावे व कार्यक्षेत्र

1) श्री. मकरंद अनासपुरे

(कला व नाम फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य )

2) श्री. विठ्ठल वाघ

(लेखन व साहित्यिक)

3) श्री विश्वास पाटील

(लेखन व साहित्यिक)

4) श्री जाहीर खान

(क्रीडा)

5) श्रीमती मंगलाताई बनसोडे

( कला )

6) श्री अमर हबीब

(सामाजिक कार्य व पत्रकार)

7) श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर

( सामाजिक कार्य व प्रबोधन)

8) श्री पोपटराव पवार

(सामाजिक कार्य)

9) श्री डॉ. तात्याराव लहाने

( सामाजिक कार्य व आरोग्य सेवा)

10) श्री डॉ. प्रकाश आमटे (सामाजिक कार्य)

11) श्री सत्यपाल महाराज

(सामाजिक कार्य व प्रबोधन)

12) श्री बुधाजीराव मुळीक

(विज्ञान व शेती विषयाचे गाढे अभ्यासक)

दरम्यान, राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीच्या सरकारने याआधी १२ जणांच्या नावांची राज्यपालांकडे सुपूर्द केली. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नाही आहे यातच आता सदाभाऊ खोतांनी राज्यपालांची भेट घेऊन ही नावे सुचवल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी – अतुल भातखळकर 

News Desk

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे”; अतुल भातखळकरांची टीका!

News Desk

MPSC परिक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला – पंकजा मुंडे

News Desk