HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाला विस्थापितांना मोठं होऊन द्यायचं नाही, सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप

जळगाव। मराठा समाजाला विस्थापितांना मोठं होऊन द्यायचं नाही, असे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केले. त्यामुळेच राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. ते बुधवारी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव येथे शेतकरी संवाद यात्रेच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला टार्गेट केलय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, महाविकासआघाडी सरकारला ते टिकवता आले नाही.

आतादेखील सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावेल. ती स्वीकारली तरी मराठा आरक्षणाला मान्यता मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. राज्यात प्रस्थापित आणि विस्थापित असा प्रकार आहे. प्रस्थापित मराठयांना विस्थापितांना मोठं होऊ द्यायचं नाही, म्हणून राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा समजाला आरक्षण दिले नाही, असेही खोत यांनी सांगितले राज्य सरकार शेतकरी विरोधी आणि पळपुटं आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी हे सरकार बरखास्त करण्याची मागणी आम्ही करणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

येत्या २५ तारखेला मुंबईत गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. या गोलमेज परिषदेला माजी मुख्यमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनाही परिषदेला आमंत्रित केलं जाणार आहे, असं सांगतानाच प्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावरचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच केंद्राविरोधात आंदोलन करावं लागलं तर तेही करू, पण सध्या प्रश्न राज्याचा आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोला येथे ‘वॉटर रन’द्वारे जनजागृती

Aprna

कांजूरमार्गमधील ‘त्या’ कोरोना बाधिताने बाहेरगावी प्रवास केला नव्हता

News Desk

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मागणी

News Desk