HW News Marathi
महाराष्ट्र

पोटनिवडणूकीवरुन राजकारण तापलं, पोटनिवडणुकीविरोधात न्यायालयात जाण्याची पंकजा मुंडेंची भूमिका

मुंबई। ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थेतील कोणतीही निवडणूक घेऊ नये अशी भूमिका ओबीसी मंत्री आणि भाजप नेत्यांनी घेतल्यानंतर मात्र (२२जून) ला काल राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका जाहीर केल्या. यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हे समाजासाठी धक्कादायक असल्याचं म्हटंल आहे. तसंच, ओबीसींचा इम्पिरिकल डाटा मिळत नसेल तर ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुका राज्य सरकारने रद्द कराव्यात असा सल्ला देखील पंकजा मुंडे यांनी दिला.

पंकजा मुंडे यांनी निवडणुकांच्या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे, अशी टीका मुंडेनी राज्य सरकारवर केली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हे समाजासाठी धक्कादायक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या निर्णयाबद्दल न्यायालयात दाद मागणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सरकार समाजाचा इम्पिरिकल डाटा नाही म्हणून आरक्षण देणं टाळत आहे. सरकारने हा डाटा मिळवण्यासाठी विशेष कृती दल म्हणजे टास्क फोर्सची स्थापना करावी अशी मागणीही पंकजा मुंडे यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळे मुहूर्त तुमचेच आहेत, नो कमेंट्स, राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

News Desk

माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना कॉंग्रेसच्या नेत्यांकडून जयंतीनिमित्त अभिवादन!

News Desk

होय कर्जमाफीची घाई केली…त्यामुळेच चूका !

News Desk