HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे सरकारमधील मित्रपक्षाच्या नाराजीवर सूचक विधान 

मुंबई | पुरेसा विकास निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे ११ आमदार नाराज असून ते लवकरच उपोषणाला बसणार आहेत. काँग्रेस आमदारांच्या नाराजीवर शिवसेनेनं ‘सामना’मधून सूचक भाष्य केलं आहे. आमदार उपोषणाला बसणार असतील तर तो काँगेसचा प्रश्न. विरोधकांना हाती आयते कोलीत मिळेल व काँगेस नेतृत्वासमोरील अडचण वाढेल ती वेगळीच, अशा शब्दांत शिवसेनेनं सरकारमधील मित्रपक्षाच्या नाराजीवर सूचक विधान केलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल याविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही.

आघाडीचे सरकार चालवणे ही एक कला आहे. त्यात ही नुसती आघाडी नसून महाविकास आघाडी आहे. त्यामुळे थोडे इकडे तिकडे होणारच, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. काँगेसच्या ११ आमदारांनी आता उपोषणास बसायचे ठरवले आहे. विकास निधीचे समान वितरण झाले नाही व निधी वाटपात पक्षपात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे की, सरकारमध्ये काँगेसची उपेक्षा होत असून काँगेस एकाकी पडली आहे. याबाबत हे अकरा जण दिल्लीत जाऊन सोनिया गांधींकडे तक्रार करणार आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना या घटनांमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर तो त्यांचा भ्रम आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शरद पवारांचं ना. धो. महानोरांना पत्र’

News Desk

“श्रीराम बोले मै कहाँ बडा, मै तो बीजेपी के मॅनिफेस्टो मे पडा”, सत्यजित तांबेंनी शेअर केला व्हिडिओ

News Desk

अमृता फडणवीसांचा खोचक सवाल तर आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर!

News Desk