HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारचं टायमिंग चुकलंय, संभाजीराजेंचा टोला

कोल्हापूर | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त केल्याबद्दल भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महामंडळ बरखास्त करायचे तर ते आधीच करायला हवे होते. आता त्यांचा टायमिंग चुकलंय, अशी टीका भाजपचे खासदार संभाजीराजेंनी केली आहे. तातडीने महामंडळाचे पुनर्गठन करून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तर अशोक चव्हाण यांनी समाजातील तज्ज्ञ लोकांची समिती नेमून सुप्रीम कोर्टातील लढाईसाठी चर्चा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केलं? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत अक्रोश निर्माण झाला आहे, असं टीकास्त्रही संभाजीराजेंनी सोडले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० लाखांचा बूस्टर डोस अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्था मंदावलेलीच, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk

पुण्यातील साडीच्या दुकानाला भीषण आग, ५ कामगारांचा मृत्यू

News Desk

रिफायनरीविरोधात नाणारवासीय आक्रमक, आझाद मैदानात धरणे आंदोलन

News Desk