HW News Marathi
क्राइम

‘माझी वर्दी राष्ट्रपतींनी दिलेली, ती उतरवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना शुभेच्छा’- समीर वानखेडे

मुंबई | आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मोठ्या वादात अडकलेल्या समीर वानखेडेंना आता नव्या आव्हानांना समोरे जावे लागतं आहे. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांनी अनेक आरोपांना प्रतिउत्तर दिलंय. ‘माझी वर्दी राष्ट्रपतींनी दिलेली असून ती कुणालाही उतरवणे शक्य असेल तर त्यांना शुभेच्छा !’ अशा शब्दात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावरील टिकाकारांना आव्हान दिले आहे.

तर वानखेडेंची वर्षभरात त्यांची नोकरी जाईल

मुळात खंडणी हा खूप वाईट शब्द आहे. आपण आपातर्यंत दुबईला कधीच गेलेलो नाही. त्यामुळे आपल्यावर होणार्‍या आरोपात काहीच तथ्य नाही, असे स्पष्टिकरणही त्यांनी दिले आहे.समीर वानखेडेंवर सध्या सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब यांनी तर वानखेडेंची वर्षभरात त्यांची नोकरी जाईल, अशी धमकीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, शाहरुखचा मुलगा आर्यन खान प्रकरणापासून यापूर्वी दाऊदच्या भावावर केलेली कारवाई, अशा अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

एवढ्या मोठ्या मंत्र्याने विचार करून आरोप करावेत. अधिकारी आहे म्हणजे तो भ्रष्टाचारीच असणार, असा एकच विचार त्यांना सुचतो का ? देशसेवेसाठी कुणीच काम करत नाही ? असे वानखेडे म्हणाले. त्यामुळे मालदीव प्रकरणावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

25 हजारांची लाच घेताना कोतवाल व तलाठी अडकले एसीबीच्या जाळ्यात

Manasi Devkar

शिवरायां’नी शोधून दिले स्त्रीलंपट आरोपी

News Desk

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास दिलासा…

News Desk