HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान पाकिस्तान, चीनच्या सीमेचा वाद मिटवू शकले नाहीत, पण अयोध्येतील सीमावाद त्यांनी मिटवला

मुंबई | राम मंदिर आणि मंदिराचे भूमिपूजन हा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक स्तरांतून पाठिंबा तर टीका केली जात आहे. अशातच ‘अयोध्येच्या आणि राम मंदिराच्या प्रश्नांवर मते मागणे आता तरी थांबवा. रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका’, असा घणाघात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून केला आहे अयोध्येतील राम मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. यावरूनच हे टीकास्त्र सुरू आहे.

“राममंदिर जन्मभूमीचे राजकारण सदैव सुरुच राहिले. ते ५ ऑगस्टला तरी कायमचे संपावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्राकांड घडले. अयोध्येतून निघालेली साबरमती एक्सप्रेस गोध्रा स्थानकावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही गाडी पेटवण्यात आली, या संशयातून गुजरातमध्ये जो दंगा झाला तो सरळ हिंदू विरुद्ध मुसलमान असाच होता. या दंगलीने मोदी यांना आधी हिंदूंचे नेते आणि नंतर पंतप्रधान केले. म्हणजे या राजकीय चढाओढीतही राम आहेच”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“अयोध्या समस्या ही या देशापुढील जणू एकमेव समस्या बनली होती. सर्वांची शक्ती, वृत्तपत्रांचे रकाने त्यात खर्ची होत होते. ते आता थांबले. हे सर्व पंतप्रधान म्हणून मोदींच्या कारकीर्दीत घडले. पंतप्रधान पाकिस्तान, चीनच्या सीमेचा वाद मिटवू शकले नाहीत, पण अयोध्येतील सीमावाद त्यांनी मिटवला. त्याचे श्रेय न्यायालयाला द्यावे लागेल”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे ते असेही म्हणाले की, “राम मंदिर २८ वर्षांनी उभे राहील. या लढ्याने शरयू लाल झाली. शेवटी ज्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराचा निकाल दिला ते मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई भगवे झाले आणि राज्यसभेत पोहोचले”, असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का?”

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात, सुखरुप बचावले

Aprna

शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Aprna