HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीतील मृत्युदर राज्यात सर्वाधिक, जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा !

मुंबई | “सांगली जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मृत्युदर आहेत. पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, सांगलीच्या पालकमंत्र्यानी तातडीने राजीनामा द्यावा”, असे आक्रमक मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. “जिल्ह्यातील रुग्णालयात रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध नाहीत. सांगलीचा मृत्युदरात राज्यात सर्वात जास्त आहे. दुसरीकडे जिल्ह्यात नॉनकोव्हिड रुग्णांना उपचार मिळत नाहीत. रुग्णालयातील सुविधांसाठी जिल्ह्याला निधी मिळवून देण्यात पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा”, अशी मागणी करत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज (४ सप्टेंबर) ठिय्या आंदोलन करून चटणी-भाकरी खात पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

“सांगली जिल्हा हा जयंत पाटलांची जहागिरी आहे काय ? लोकप्रतिनिधींना आढावा बैठकीसाठी बोलवण्याचे त्यांच्यात धाडस नाही. असे जिल्ह्यात फिरणे मुश्किल होऊन जाईल. दुसरीकडे जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्सची कमतरता आहे. आवश्यक तेवढे व्हेंटिलेटर नाहीत. पालकमंत्र्यांनी मात्र जिल्ह्यातील या स्थितीकडे दुर्लक्ष केले. जिल्ह्यातील रुग्णालयांना आवश्यक सुविधा पुरवण्यातही ते अपयशी ठरले. पालकमंत्री जिल्ह्याला निधी मिळवून देऊ शकले नाहीत हा त्यांचा नाकर्तेपणा आहे. या अपयशाची जबाबदारी घेऊन सांगलीच्या पालकमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तर सदाभाऊ खोत यांनी देखील जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर समाजाचे प्रश्न, समस्या मार्गी लावणार! – मुख्यमंत्री

Aprna

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणणाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक ! – नाना पटोले

Aprna

‘डॉक्टरांचं काम शब्दात सांगण्याजोगं नाही’, उद्धव ठाकरेंचं डॉक्टरांना पत्र

Ruchita Chowdhary