HW News Marathi
देश / विदेश

‘राणेंनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी’, संजय राऊतांची इच्छा

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत महाराष्ट्राचे ४ मंत्री निवडले गेले आहेत. नारायण राणे, भरती पवार, भागवत कराड, कपिल पाटील अशी चार मंत्र्यांची नावं आहेत. चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे नारायण राणे यांना या मंत्रिमंडळात सर्वात प्रथम स्थान दिलं गेलं आहे. आधीचे कट्टर शिवसैनिक पण आता थेट भाजप मध्ये केंद्रीय मंत्रिपद स्वीकारणाऱ्या नारायण राणेंना शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांचं मत व्यक्त करत राणेंना शुभेच्छा दिल्या आहेत. नारायण राणेंनी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं पदभार स्वीकारला.

राणेंनी आता रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ज्या परिस्थितीतून आपला देश सध्या चालला आहे… बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. मोदींनी पत्ते पिसले आहेत ते बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदं आली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडला आहे. अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडलेला आहे. नक्कीच नारायण राणेंना मंत्री केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग असं खातं त्यांना दिलं. राणेंची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. अनेक पदं सांभाळली आहेत, असं सांगतानाच राणेंपुढे रोजगार वाढवण्याचं मोठं काम किंवा आव्हान आहे, असं राऊत म्हणाले.

मंत्रिमंडळात मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच

एकमात्र भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा चिमटहा त्यांनी काढला.

नारायण राणेंची राजकीय कारकीर्द

एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले नारायण राणे आता थेट भाजपच्या विधिमंडळाचे मंत्री बनले आहेत. नारायण तातू राणे यांचा जन्म २० एप्रिल १९५२ रोजी कोकणात झाला. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आक्रमक स्वभावाचे नारायण राणे शिवसेनेत वेगाने पायऱ्या चढत वर गेले. सुरुवातीला चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे १९८५ साली मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९९० साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

News Desk

WHO ने केले कोरोनाच्या प्रसंगी भारत करत असलेल्या कामगिरीचे कौतुक

swarit

जाणून घ्या…योग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट

News Desk