HW News Marathi
देश / विदेश

“वेळ पडली तर बेळगावात विरोधीपक्षाच्या नेतृत्वात आंदोलन करु, पण ते येतील का ?” 

मुंबई |”महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे. तशीच वेळ पडली तर बेळगावात जाऊन त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे आंदोलन करायला तयार आहोत. मात्र, ते यायला तयार आहेत का ? हे एकदा विचारा”, असा विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान, बेळगावामधील मनगुत्ती गावातून शुक्रवारी (७ ऑगस्ट) एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हटवण्यात आल्याची घटना घडली. कर्नाटक सरकारच्याच आदेशानुसार संपूर्ण पोलीस बंदोबस्तात एका रात्रीत शिवरायांचा हा पुतळा हटविण्यात आला. दरम्यान, या प्रकारानंतर शिवप्रेमींकडून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.

“वेळ पडली तर बेळगावात विरोधीपक्षाच्या नेतृत्वात आंदोलन करु, पण ते येतील का ?”

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या अंधारात पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला त्या घटनेचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे. मात्र, राज्यातील विरोधीपक्ष याबाबतच काहीच बोलायला तयार नाही. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची दखल घ्यायला हवी. विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे. तशीच वेळ पडली तर बेळगावात जाऊन त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे आंदोलन करायला तयार आहोत. मात्र, ते यायला तयार आहेत का ? हे एकदा विचारा”, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या प्रश्नाला महाराष्ट्र्र भाजप नेमके काय उत्तर देणार ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४ दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यादरम्यान बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. मात्र, आता भाजपचेच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो याचा नेमका अर्थ काय ?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारच्या आदेशानंतर बेळगाव जिल्हा प्रशासनाने एका रात्रीत शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा हटवला. गावातीलच दुसऱ्या गटातील नागरिकांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर हा पुतळा हटवण्यात आल्याची माहिती मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना; 6 जणांचा मृत्यू

Aprna

सावधान! समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध होणार कठोर कारवाई

News Desk

कमल हासन यांना गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल | हिंदू महासभा

News Desk